• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos deadline for kiran sanman yojna will end on 31st august spb

PHOTOS : ३१ ऑगस्ट रोजी संपणार ‘या’ महत्त्वाच्या कामांची मुदत; जाणून घ्या…

ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. दोन दिवसांनी सप्टेंबर महिना सुरू होईल. त्यापूर्वी ३१ ऑगस्ट रोजी अनेक महत्त्वाच्या कामांची मुदत संपणार आहे.

August 29, 2022 19:41 IST
Follow Us
  • kiran sanman yojna
    1/9

    ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. दोन दिवसांनी सप्टेंबर महिना सुरू होईल. त्यापूर्वी ३१ ऑगस्ट रोजी अनेक महत्त्वाच्या कामांची मुदत संपणार आहे. मात्र, ३१ ऑगस्टरोजी ही गणेश चतुर्थीची सुट्टी असल्याने बॅंकेची कामे करायला केवळ ३० ऑगस्ट म्हणजे आजचा दिवस आहे.

  • 2/9

    तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर ३१ ऑगस्टपर्यंत eKYCचे काम पूर्ण करावे लागले. eKYC पूर्ण करण्यासाठी सरकारकडून शेवटची संधी आहे.

  • 3/9

    याशिवाय १२वा हप्ताही योजनेअंतर्गत मिळणार आहे. तुम्ही eKYC न केल्यास तुमचा हप्ता थांबवला जाण्याची शक्यता आहे.

  • 4/9

    यापूर्वी, सरकारकडून eKYC करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. जी सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.

  • 5/9

    सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसानचा योजनेचा १२वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाण्याची शक्यता आहे. या योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात.

  • 6/9

    तुमचे खाते पीएनबीमध्ये असल्यास, कोणत्याही परिस्थितीत ३१ ऑगस्टपर्यंत तुम्हाला eKYC पूर्ण करावे लागले. बँकेकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जर eKYC मुदतीत पूर्ण झाले नाही, तर खाते होल्ड केले जाऊ शकते.

  • 7/9

    पीएनबीने केलेल्या ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे की, जर कोणत्याही ग्राहकाचे eKYC बाकी असेल तर ३१ ऑगस्टपर्यंत शाखेत जाऊन हे काम पूर्ण करावे लागेल.

  • 8/9

    जर करदात्याने ३१ जुलैनंतर आयटीआर भरला असेल तर त्याला पडताळणीसाठी ३० दिवस मिळतात. ३१ जुलैपर्यंत रिटर्न भरणाऱ्यांना पडताळणीसाठी १२० दिवस मिळतील.

  • 9/9

    अशा परिस्थितीत, जर करदात्याने १ ऑगस्ट रोजी त्याचे विवरणपत्र भरले असेल, तर त्याच्या पडताळणीची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपेल. पडताळणीशिवाय, परतावा पूर्ण मानला जाणार नाही.

TOPICS
प्राप्तिकरIncome Taxमराठी बातम्याMarathi News

Web Title: Photos deadline for kiran sanman yojna will end on 31st august spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.