-
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (२६ ऑक्टोबर) शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर निळवंडे धरणाच्या कामावरून जु्न्या राज्यकर्त्यांना टोला लगावला.
-
शिर्डीतील काकडी येथे आयोजित केलेल्या नमो शेतकरी महासन्मान मेळाव्यात अजित पवार नेमके काय म्हणाले याचा हा आढावा…
-
गेल्या साडेनऊ ते दहा वर्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द बघितली तर ते साईबाबांच्या सबका मालिक एक या मंत्राप्रमाणेच सबका साथ, सबका विकास या घोषणेनुसार देशाला पुढे नेत आहेत. ते सर्वांना पावलोपावली जाणवत आहे – अजित पवार
-
महाराष्ट्राने कायमच राष्ट्राचा विचार केला आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकटं आली, तेव्हा तेव्हा महाराष्ट्र छातीचा कोट करून राष्ट्राबरोबर उभा राहिला. हा इतिहास आहे – अजित पवार
-
यशवंतराव चव्हाण यांनी हीच भूमिका वारंवार मांडली होती – अजित पवार
-
त्याच भूमिकेतून आज मोदी राष्ट्र बळकट करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला – अजित पवार
-
माझं आजोळ नगर जिल्हा आहे. मला आठवतंय, ५३ वर्षे कितीतरी वेळा निळवंडे धरणाचा नारळ फोडण्याचं काम अनेक राज्यकर्त्यांनी केलं – अजित पवार
-
निवडणुका आल्या की, नारळ फोडायचा आणि आम्ही आता निळवंडे करणार असं सांगितलं गेलं – अजित पवार
-
बघता बघता तीन पिढ्या यात गेल्या – अजित पवार
-
हे साडेआठ टीएमसीचं धरण आहे. पावणेदोन लाख एकर क्षेत्र यामुळे ओलिताखाली येईल – अजित पवार
-
मोदी निळवंडे धरणाचं जलपुजन करत असताना आम्हाला सांगत होते की, बाबांनो पाणी महत्त्वाचं आहे – अजित पवार
-
ठिबकचा वापर करा. पाण्याची जितकी बचत करता येईल तितकी बचत करा. तरच आपल्या सर्व शेतकऱ्यांना ते पाणी मिळेल, असं मोदींनी सांगितलं – अजित पवार
-
खूप लोकांची जमीन जुमला, घरं दारं त्या निळवंडे धरणात गेली आहेत. त्यानंतर ते पाणी इतरांना मिळणार आहे – अजित पवार
-
जवळपास १८२ गावांना हे पाणी देण्याचं काम होत आहे – अजित पवार
-
सर्व छायाचित्र – अजित पवार, भाजपा सोशल मीडिया व संग्रहित)
“माझं आजोळ नगर जिल्हा, मला आठवतंय, ५३ वर्षे कितीतरी वेळा…”; अजित पवारांचा जुन्या राज्यकर्त्यांवर हल्लाबोल
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (२६ ऑक्टोबर) शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर निळवंडे धरणाच्या कामावरून जु्न्या राज्यकर्त्यांना टोला लगावला.
Web Title: Ajit pawar comment on nilvande dam canal in ahmednagar pm narendra modi pbs