• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. why is bharat band today what are the main reasons know here spl

आज भारत बंद का आहे?; अनेक रस्त्यांवर शांतता तर काही ठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज, पाहा फोटो

Why is Bharat Band today? : भारत बंदची काही छायाचित्रे समोर आली आहेत ज्यात काही ठिकाणी पोलीस लाठीचार्ज करताना दिसत आहेत तर काही ठिकाणी शांतता दिसून आली आहे.

Updated: August 21, 2024 15:03 IST
Follow Us
  • why is India closed
    1/9

    अनुसूचित जाती-जमाती आरक्षणातील क्रिमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात देशभरातील विविध संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. (पीटीआय)

  • 2/9

    बंदचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. भारत बंदचा सार्वजनिक वाहतूक सेवा आणि रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. (पीटीआय)

  • 3/9

    भारत बंदची काही छायाचित्रे समोर आली आहेत ज्यात अनेक ठिकाणी लोक रेल्वे गाड्यांसमोर आंदोलन करत आहेत तर अनेक ठिकाणी लोक सार्वजनिक वाहनांची वाट पाहत उभे आहेत. (पीटीआय)

  • 4/9

    भारत बंददरम्यान सार्वजनिक वाहतूक सेवेवर याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. (पीटीआय)

  • 5/9

    भारत बंदचा सर्वाधिक परिणाम झारखंड, बिहार आणि राजस्थानमध्ये दिसून येत आहे. झारखंडमध्ये अनेक ठिकाणी या काळात लोकांनी सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान केले. (पीटीआय)

  • 6/9

    अनेक राजकीय पक्षांनीही भारत बंदला पाठिंबा दिला आहे. ज्यामध्ये बहुजन समाज पार्टी (BSP), राष्ट्रीय लोकदल (NP), आझाद समाज पार्टी (कांशीराम) आणि इतर संघटनांनी पाठिंबा दिला आहे. (पीटीआय)

  • 7/9

    यादरम्यान काही ठिकाणी निदर्शने करणाऱ्यांवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. (पीटीआय)

  • 8/9

    भारत बंदचे कारण
    दरम्यान, नुकताच सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील क्रिमी लेयर वर्गाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या प्रवर्गातील गरजू लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. (पीटीआय)

  • 9/9

    सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होईल, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. कारण, आधीच लागू केलेल्या आरक्षणांमध्ये हे विशेष आरक्षण आहे. अशा स्थितीत देश बचाओ संघर्ष समितीच्यावतीने देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. (पीटीआय)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Why is bharat band today what are the main reasons know here spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.