-
करोना विषाणूचा उद्भाव झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक करोना रुग्ण आढळत होते.
-
मुंबईसह पुणे, ठाणे आणि इतर मोठ्या शहरांत रुग्णांचे प्रचंड हाल होत होते.
-
दरम्यानच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचा प्रमुख म्हणून अत्यंत चांगल्या प्रकारे सर्व परिस्थिती हाताळली.
-
ते दररोज फेसबूक लाईव्हद्वारे लोकांशी संवाद साधत होते. तसेच लोकांना करोना संसर्गाबाबत जागरूक करत होते.
-
मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यानंतर आता महाराष्ट्रासह देशात करोना संसर्ग कमी झाला आहे.
-
याच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगर पालिकेतील रुग्णालयाच्या नर्सनं आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांना राखी बांधून कोविड काळात केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.
PHOTOS: महापालिकेच्या नर्सनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी; कोविड काळातील सहकार्याबद्दल मानले आभार
बृहन्मुंबई महानगर पालिकेतील रुग्णालयाच्या नर्सनं आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांना राखी बांधून कोविड काळात केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.
Web Title: Hospital nurse of bmc thanked uddhav thackeray for cooperation during corona pandemic tie rakhi at matoshree rmm