करोना म्हणजेच कोविड १९ (Covid-19) हा एक महाभयंकर आजार आहे. वटवाघूळ या प्राण्यापासून हा आजार जगभर पसरल्याचे सांगितले जाते. चीनमध्ये या आजाराचा उद्रेक २०१९ मध्ये झाल्याने याला कोविड १९ असे नाव पडले. काहीच्या मते, हा आजार चीनमधून पसरला आहे. परंतु त्याबाबत आजही खात्रीदायक पुरावे उपलब्ध नाही आहेत. भारतामध्ये करोना (Coronavirus) मार्च २०२० मध्ये पसरायला लागला. परिस्थिती गंभीर झाल्याने भारतामध्ये टाळेबंदी झाली.
भारतासह अनेक देशांमध्ये हाहाकार माजला. पुढे हळूहळू ही लाट ओसरली. लगेच काही महिन्यांनी करोनाची दुसरी लाट आली. आपल्या देशातील अनेक राज्यांना दोनपेक्षा जास्त करोना लाटांचा सामना करावा लागला. या महामारीमध्ये अनेकांचे बळी गेले. आर्थिक नुकसान झाले. सरकारने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवली. करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर गोष्टी रुळावर आल्या. २०२२ च्या शेवटी करोनाचा नवा व्हेरिएंट समोर आला होता. पण पुढे त्यासंबंधित माहिती समोर आली नाही. Read More
राज्यात नव्या वर्षाच्या सुरुवातील करोनाच्या ‘जे.एन.१’ या नव्या उपप्रकाराची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…