-
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या अधिकृत बुलेटिनमध्ये आसाममधून बाहेर येत असलेले चित्र भयावह आहे.
-
कारण पुरामुळे लोकांचे जीवन धोक्यात आले असून, चार लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.
-
ब्रह्मपुत्रेच्या पाण्याची पातळी गुरुवारी अनेक भागात चिंतेचे कारण ठरल्यान नवीन मृत्यूची नोंद झाली.
-
बुलेटिननुसार, धुबरी, गोलपारा, गुवाहाटी, तेजपूर आणि नेमतीघाट येथील नदी धोक्याच्या पातळीवर होती. आसाममधील पुराचा लोकांच्या जीवनमानाला कसा फटका बसला आहे ते पाहा.
-
पुरामुळे बाधित झालेल्या एकूण लोकसंख्येची संख्या १९ जिल्ह्यांमध्ये ४,०३,३१३ झाली आहे, जी मागील दिवशी २२ जिल्ह्यांमध्ये ३,४०,९३७ होती. (प्रतिमा: पीटीआय)
-
गुरुवारी ७२,८५२ बाधितांसह दररंग सर्वात जास्त प्रभावित झाले, त्यानंतर नलबारीमध्ये ७२,४२७, माजुलीमध्ये ६१,२३८, गोलाघाटमध्ये ५७,४२० आणि मोरीगावमध्ये ४४,१८१ बाधित झाले. (प्रतिमा: पीटीआय)
-
एकूण ३,०३१ लोकांनी १२५ मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. (प्रतिमा: पीटीआय)
-
गोलाघाट जिल्ह्यात पुराच्या पाण्यात एक जण वाहून गेला. (प्रतिमा: पीटीआय)
-
बाधित जिल्ह्यांचे अधिकारी ११६ वितरण केंद्रांद्वारे मदत वाटप करत आहेत. (प्रतिमा: पीटीआय)
-
३१ ऑगस्ट रोजी पूरग्रस्त पोबिटोरा वन्यजीव अभयारण्यात एक गेंडा पाण्यात अडकला आहे. (प्रतिमा: PTI)
-
३० ऑगस्ट रोजी एक माणूस पूरग्रस्त भागात एलपीजी सिलिंडर घेऊन जात आहे. (प्रतिमा: PTI)
-
मोरीगाव जिल्ह्यात ३० ऑगस्ट रोजी बोटीवरील एक महिला पूरग्रस्त भागातून जात आहे. (प्रतिमा: PTI)
-
ईशान्येकडील आसाम राज्यात पुराचा कहर अजूनही कायम आहे. या आपत्तीत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. (प्रतिमा: PTI)
-
राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये अद्याप २.४ लाख लोक पुराने बाधित आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मते, राज्यातील नलबारी आणि दररंग हे दोन जिल्हे पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.
आसाममध्ये पूरस्थिती कायम! लाखो विस्थापित, राष्ट्रीय उद्यानांना फटका
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) च्या अधिकृत बुलेटिनमध्ये आसाममधून बाहेर येत असलेले चित्र भयावह आहे. कारण पुरामुळे लोकांचे जीवन धोक्यात आले असून, चार लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.
Web Title: Assam flood situation remains grim lakhs displaced national parks hit see photos fehd import vrd