मुंबई : राज्यातील मतदानाची झारखंडमधील मदतानाशी तुलना करून गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र राज्यातील लोक संध्याकाळीच मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडतात. शेवटच्या दोन तासांत ७६ लाख मतदारांनी मतदान केल्याचा दावा केला जात असला तरी एक लाख मतदान केंद्रांचा विचार करता एका मतदान केंद्रावर फक्त ७६ लोकांनी मतदान केले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी नव्हत्या, असा दावा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> टपाली मते, मतदान यंत्रांमधील मतांमध्ये तफावत कशी? शिवसेना ठाकरे गटाचा सवाल

राज्यात शेवटच्या दोन तासांत मतदानात झालेल्या वाढीवरून विरोधकांनी निवडणूक आयोगालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल आहे. टपाली मतदानाचा कल आणि मतदान यंत्रातील मतांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा शिवसेनेने (उद्धव ठाकरे) केला आहे, तर मतदानादिवशी संध्याकाळी पाच वाजताचे मतदान आणि दुसऱ्या दिवशी आयोगाने जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी यात ६.८३ टक्क्यांची वाढ असल्याचा आरोप काँग्रेसने केला. निवडणूक आयोगाने मात्र महाविकास आघाडीकडून करण्यात येणारे आरोप फेटाळले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surge in voting percentage is normal says chockalingam print politics news zws