प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अद्याप जिल्ह्यातील एक लाख ५९ हजार ८६३ लाभार्थ्यांची ग्राहक ओळख पडताळणी प्रक्रिया (ई-केवायसी) प्रलंबित आहे. संकेतस्थळावरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या मुदतीत प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : साडेतीन लाख पुणेकरांनी जोडले मतदार यादीला आधार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रीक हे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. योजनेच्या लाभासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण चार लाख ९८ हजार २७८ शेतकऱ्यांपैकी तीन लाख ३८ हजार ४१५ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरीत एक लाख ५९ हजार ८६३ लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Identity verification of 1 59 lakh beneficiaries of pradhan mantri kisan yojana schemes is pending pune print news amy