ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) शुक्रवारी काटई नाका येथे जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या कामामुळे ठाणे महपालिका क्षेत्रात शुक्रवारी दुपारी १२ ते रात्री १२ या कालावधीत एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… ठाण्यात डिजिटल प्रचाराची नांदी!

हेही वाचा… ठाणे, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची चार कोटीची फसवणूक

ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, कळवा, वागळे इस्टेट येथील रुपादेवी पाडा, किसननगर, नेहरूनगर आणि घोडबंदर येथील कोलशेत भागात एमआयडीसी मार्फत पाणी पुरवठा केला जातो. काटई नाका येथे एमआयडीसीच्या जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे या भागात होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी दुपारी १२ ते रात्री १२ या कालावधीत बंद राहणार आहे. तसेच दुरूस्तीनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane city no water supply on friday asj