आगामी विधान निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दोनशे जागा निवडून येतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या दोनशे जागा निवडून येणार असल्यामुळेच दंगलीचे प्रकार घडत आहेत, असा दावाही त्यांनी केला.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि फडणवीस सरकारने सर्व्हे केला आहे. त्यात सरकार पुन्हा सत्तेत येईल, असे समोर आल्याचा दावा शिंदे आणि फडणवीस सरकारने केला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेकडून वाहनतळाची उभारणी

मी संपूर्ण राज्यभरात फिरत असतो. त्यामुळे मला परिस्थिती काय आहे, हे माहीत आहे. आगामी विधान निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दोनशे जागा निवडून येतील. आमच्या सर्व्हेत सुद्धा हे समोर आले आहे, असा दावाही त्यांनी केला. आगामी विधान निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दोनशे जागा निवडून येणार आहेत. त्यामुळेच दंगलीचे प्रकार घडत आहेत. राज्यात महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. यापूर्वी राज्यात अशी इतकी गंभीर परिस्थिती नव्हती, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा >>> ठाणे : जिल्ह्यात शेतकरी आठवडी बाजाराला घरघर, बाजाराची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचत नसल्याचे शेतकऱ्यांचे मत

उत्तरप्रदेश सरकारने माफी मागावी मुंब्र्यात कोणतेही धर्मांतर झालेले नसल्याचे ठाणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यामुळे राज्याच्या गृह विभागाने उत्तरप्रदेश सरकारला कडक शब्दात पत्र देऊन माफी मागण्यास सांगावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. धर्मांतर प्रकरणावरून राज्यासह मुंब्रा शहर आणि मला बदनाम करण्याचा डाव होता. पण, मी पहिल्याच दिवशी यादी मागून याप्रकरणी ठाणे पोलिसांकडे चौकशीची मागणी केली होती. अखेर सत्य समोर आले आहे, असेही ते म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha vikas aghadi will win two hundred seats in maharashtra claim by ncp leader jitendra awhad zws