कल्याण- औरंगाबादहून येत असलेली राज्यराणी एक्सप्रेस सोमवारी पहाटे मुंबईच्या दिशेने धावत होती. आंबिवली-शहाड रेल्वे स्थानकांच्या दरम्यान या एक्सप्रेसवर लगतच्या झोपडपट्टीमधून एका अज्ञात इसमाने एक्सप्रेसच्या दिशेने दगड फिरकावला. हा दगड खिडकी जवळ बसलेल्या दिवा येथील महिलेच्या डोळ्याला लागला. या महिलेच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या भागातील इसमाचा लोहमार्ग पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा- ठाणे: कामगार नेते राजन राजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
राज्यराणी एक्सप्रेसमधून प्रवास करत असलेल्या रमाबाई पाटील (५५) या महिला डोळ्याला दगड लागल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याण