Accident viral video: सोशल मीडियामुळे रोज असंख्य व्हिडीओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये काही चांगले व्हिडीओ असतात. तर काही व्हिडीओ भयानक असतात. अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसतो एवढं मात्र नक्की. कारण मागच्या काही दिवसांपासून इतके भयानक अपघात झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत की, लोकांनी ते पाहिल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे.सध्या असाच एक रस्ते अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे जो खूपच धोकादायक आहे. हा अपघात किती हृदय पिळवटून टाकणारा आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, कारने धडक दिल्यानंतर दुचाकीवर असणारे तिन्ही तरुण उंचावर हवेत उडाले. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल एवढं नक्की

रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, जो पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालविण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवत असेल, तर अपघात हे होतातच. अशा वेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. सध्या समोर आलेल्या प्रकरणातही असंच काहीसं घडलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून, आता तुम्हीच सांगा यामध्ये चूक नेमकी कुणाची?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मोकळा रस्ता दिसत आहे. फार गाड्यांची वरदळही नाहीये. मात्र याच वेळी एका बाजूनं भरधाव वेगात कार येते आणि समोरुन तितक्याच वेगात बाईक येते. यावेळी कारची आणि बाईकची समोरा-समोर जोरदार धडक होते. ही धडक इतकी जोरात होती की बाईकवरचे तिन्ही तरुण हवेत अक्षरश: उडाले.या व्हिडीओमध्ये चूक दोन्ही बाजूंनी झाल्याचे समोर आले आहे; ज्यामधून एका वाहनचालकाचा वेग आणि समोरील वाहनचालकाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल. चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवून इतरांची सुरक्षा धोक्यात घातल्यामुळे नेटकरीही संतापले आहेत.सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात, ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा.