E-Rickshaw Bike Crash: अपघात कसा आणि कधी होईल हे सांगता येत नाही. अति घाई संकटात नेई म्हणतात ना तसंच काहीसं घडलं आहे. आकस्मिक अपघातामुळे अनेकदा लोकांच्या जीवावर बेतलेल्या घटना आपण ऐकल्या असतील. कधी चुकीमुळे तर कधी आकस्मिकरित्या. आजच्या घडीला रस्ते अपघात हे मोठं संकट बनलं आहे. दररोज लाखो लोक याच्या झळा सहन करत आहेत. अनेकदा या दुर्घटना चालकाची चूक, निष्काळजीपणा किंवा रस्त्यावर चालणाऱ्या एखाद्याच्या अनास्थेमुळे घडतात. परिणामी, काही वेळा निरपराध व्यक्तींनाही जीव गमवावा लागतो. असाच एक थरारक अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून कुणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
कधी कोणासोबत काय होईल सांगता येत नाही. एका रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ असते. त्यावेळी अनेक जण आपापल्या कामावर जात असतात. काही जण दुचाकीवर, तर काही जण आपल्या कारमध्ये प्रवास करताना दिसत आहेत. त्याचबरोबर काही जण रिक्षाने प्रवास करताना दिसत आहेत. त्याचवेळी एक भनायक घटना घडली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या व्हिडीओमध्ये दिसतं की, एक बाईकस्वार भरधाव वेगाने जात असतो. त्याच वेळी एक ई-रिक्षा रस्त्याच्या मध्यातून अचानक कट मारण्याचा प्रयत्न करते आणि दोघांमध्ये भीषण धडक होते. हे दृश्य इतकं अंगावर येणारं आहे की काही क्षणांसाठी श्वास रोखल्यासारखं वाटतं. टक्कर इतकी जबरदस्त असते की रिक्षामध्ये बसलेलं एक लहान मूल जोरजोराने रडायला लागतं. सुदैवाने इतका भयंकर अपघात होऊनही कुणालाही जीवघेणी दुखापत झाली नाही.
हा संपूर्ण प्रकार एका मागून येणाऱ्या व्यक्तीने आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडीओ सध्या ‘lolipop_500’ नावाच्या इन्स्टा अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, हजारो लोकांनी तो पाहिला आहे आणि त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, “अशा प्रकारचा जीवघेणा अपघात मी पहिल्यांदाच पाहतो आहे.” दुसऱ्याने लिहिलं, “ई-रिक्षाचालकाने चुकीच्या पद्धतीने कट मारल्यामुळे ही दुर्घटना घडली.” तर आणखी एका युजरने लिहिलं, “रस्त्यावरचा वेग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे.”
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा https://www.instagram.com/p/DKQtFsLIZwJ/utm_source=ig_embed&utm_campaign=invalid&ig_rid=d07b2c8d-8eea-4c66-8e7b-6944fcdb6caa
हा अपघात जरी जीवघेणा असला तरी एक मोठी दुर्घटना टळली, हेच खरं. मात्र, यामधून एक मोठा धडा घेण्यासारखा आहे. रस्त्यावर वाहन चालवताना अतिशय जागरूक राहणं आवश्यक आहे, कारण एका चुकीमुळे अनेकांचे आयुष्य धोक्यात येऊ शकतं.