Video Shows Friend Carries Another Friend Through Flooded Water : वेळेचे महत्व काय असते हे संकटकाळात करते. असं म्हणतात प्रत्येकाची वेळ असते. प्रत्येकावर वेळ येते आणि यादरम्यान माणसं बदलत असतात. त्यामुळे वेळेचा दुरुपयोग करू नये. कारण – वेळ कधीही बदलू शकते आणि अशा वेळेत चांगल्या माणसं आजूबाजूला असतात. कारण – चांगल्या माणसांमुळेच चांगली वाईट वेळ चांगल्या वेळेत बदलू शकते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राला पाठीवर बसवून घेतलं आहे.

व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, व्हिडीओत दोन मित्र दिसत आहेत. पावसामुळे प्रचंड पाणी तुंबलेले दिसते आहे. पांढरे शूज काढून, पायात स्लिपर घालून, बॅग पुढे घेऊन तो त्या पाण्यातून जाण्यासाठी तयार होतो. एवढंच नाही तर मागून दुसरा मित्र येतो आणि त्याच्या पाठीवर बसतो आणि तुंबलेला पाण्यात हळुवारपणे चालत जातो आणि चांगल्या जागेत त्याला खाली उतरवतो.एका वेळेनंतर माणसं महत्त्वाची असतात हे या व्हिडीओतून स्पष्ट होत आहेत.

मैत्रीला कधीच विसरणार नाही… (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, मित्राला घाण पाण्यात न उतरवता. थेट आपल्या पाठीवर बसवून घेऊन जातो. जेणेकरून त्याचे शूज खराब होणार नाहीत आणि त्याला घाण पाण्यात उतरावे लागणार नाही. आपण दिवसरात्र काम करून पैसे कमावण्यात व्यस्थ होऊन जातो. अनेकदा वेळ न दिल्यामुळे मैत्री, नाती तुटतात किंवा अबोला धरतात. पण, पैसे पुन्हा कमावता येतात. मैत्री, नाती एकदा कायमची तुटली तर ती पुन्हा जोडली जात नाहीत. त्यामुळे “कितीही भांडण झाली तरी पूर्ण बोलणं बंद करू नका. कारण – मित्र पुन्हा भेटतं नाहीत” ; असा मेसेज व्हिडीओवर लिहिला आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @aprajeet_motivation या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “कोणी कसं ही वागलं तरी चालेल पण मी माझ्या हृदयाच्या तळाशी असलेल्या मैत्रीला कधीच विसरणार नाही”, “देव मला पण असा मित्र दे” तसेच अनेक जण रुसलेल्या मित्र-मैत्रिणींना कमेंटमध्ये टॅग करताना दिसत आहेत आणि या व्हिडीओने सोशल मीडियावर मैत्रीची खरी व्याख्या सांगितली आहे.