वसई: पहिल्या पावसात वसई विरार शहरात दोन तरुणांचा बळी गेली आहे. पहिल्या घटनेत विरारच्या अर्नाळा समुद्रकिनार्‍यावर फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तर दुसर्‍या घटनेत नालासोपारा येथे पालिकेच्या पथदिव्यामुळे वीजेच्या धक्का लागून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाळा सुरू होताच वसईतील समुद्रकिनारे पर्यटकांना खुणावू लागतात. रविवारी पावसाला सुरवात झाल्यानंतर पर्यटकांची वसईतील विविध समुद्रकिनार्‍यावर गर्दी झाली होती. वसईच्या गावराईपाडा येथे राहणारा देवराय राय (१९) हा तरुण आपल्या मित्रांसमवेर रविवारी दुपारी विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेला होता. तो समुद्रात पोहण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाला. संध्याकाळी उशीरा त्याचा मृतदेह हाती लागला. या प्रकरणी विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा : वसई: राष्ट्रीय महामार्गावर खड्डे, काँग्रेसने खानिवडे टोल नाका बंद पाडला

दुसर्‍या घटनेत नालासोपारा येथे वीजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. रविवारी पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचले होेते. रात्री साडेनऊच्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या महेशपार्क परिसरात साचलेल्या पाण्यातून रोहन कासकर (२९) हा तरूण जात होता. तेथे असेलल्या पालिकेत्या पथदिव्याला त्याने आधार घेतला. मात्र पथदिव्यात पाण्यामुळे वीजेचा प्रवाह होता. त्या झटक्याने रोहन खाली फेकला गेला. स्थानिकांनी त्याला पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथ उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai rain two died one drown in sea and other one electrocuted css