अजिंठा-वेरुळ, पैठण असे पर्यटनस्थळ आणि तीर्थक्षेत्र येथे जाण्यासाठी ४२७ किलोमीटरचे चौपदरी रस्ते करायला हवेत. त्यामुळे आठही जिल्हे जोडले जातील. त्यासाठी १७०० कोटी रुपयांची गरज आहे. विजेचे प्रश्न बिकट आहेत. विजेच्या पायाभूत सुविधा मोठय़ा प्रमाणात करून देण्याची गरज आहे. कापूस विदर्भ आणि मराठवाडय़ात पिकतो. त्यामुळे टेक्सटाइल पार्कसारखा महत्त्वाचा उद्योग मराठवाडा, विदर्भात आणायला हवा.
अनुशेष कधी भरणार?
– दिवाकर रावते
यंदाच्या अर्थसंकल्पात सिंचनाच्या बाबतीत ७२४९ कोटी दिले आहेत. यातून १४० प्रकल्प करणार असल्याचेही जाहीर झाले. मात्र या १४० पैकी किती प्रकल्प मराठवाडय़ासाठी असतील, हा प्रश्न आहे. यात आमची व्यथा अशी आहे की, कृष्णा खोऱ्यातून आम्हाला २५ टीएमसी पाणी मिळायचे आहे.
कृष्णा खोऱ्यात आम्हाला वाटा द्यायचा असेल, तर दहा टक्के द्या. कारण एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी दहा टक्के वाटा मराठवाडय़ाचा आहे.