बारावीच्या निकालात लातूर विभागाने राज्यात चौथे, तर विभागात अग्रस्थान पटकावले. दहावीपेक्षा बारावीच्या निकालात विद्यार्थ्यांनी २० टक्क्यांनी प्रगती केली. वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी बारावीच्या गुणापेक्षा सीईटीच्या गुणांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेकडे विद्यार्थी फारसे लक्ष देत नाहीत. लातूरच्या विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेतही चांगली प्रगती केल्यामुळे लातूरची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली.
या वर्षी क्रीडा विषयातील २५ गुण न मिळाल्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरली. या वर्षी बारावीचा अभ्यासक्रम नवीन होता. यात ७० गुण लेखी परीक्षेला, तर प्रात्यक्षिक परीक्षेला ३० गुण होते. अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेशासाठी बारावीच्या परीक्षेत किमान ५० टक्के गुण आवश्यक असतात. गतवर्षी अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहात असल्यामुळे ५० टक्क्यांची अट शिथिल केली होती. या वर्षी ही अट पुन्हा शिथिल होणार की ५० टक्क्यांची अट कायम राहणार, याची चर्चा सुरू झाली आहे. सीईटी परीक्षेच्या निकालाला आणखी काही दिवस असले तरी पालक आतापासूनच आपल्या पाल्याच्या प्रवेशाच्या तयारीला लागले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jun 2013 रोजी प्रकाशित
बारावीच्या निकालात लातूरचा टक्का वधारला
बारावीच्या निकालात लातूर विभागाने राज्यात चौथे, तर विभागात अग्रस्थान पटकावले. दहावीपेक्षा बारावीच्या निकालात विद्यार्थ्यांनी २० टक्क्यांनी प्रगती केली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-06-2013 at 01:42 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latur go up in hsc result