औरंगाबाद : शासन व प्रशासनातील शालेय पोषण आहार निविदेच्या नस्तीच्या घोळामुळे गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शालेय पोषण आहार बंद पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑक्टोबर- नोव्हेंबरसाठी जुन्या कंत्राटदारास ३२ दिवस धान्य पुरवठय़ाचे आदेश दिले आहेत. अकोला जिल्ह्यात तर गेल्या दीड वर्षांपासून शालेय पोषण आहार मिळत नसल्याचे राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या विषयाच्या अनुषंगाने चर्चा केली आहे. एक सरकार पडून दुसरे  येईपर्यंत नस्ती प्रवास संचालक, सचिव, मंत्री त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असा झाला. पण प्रश्न काही मिटला नाही. शालेय पोषण आहाराबरोबर मेळघाटात वेळेवर अंडी पुरवठा होत नसल्याने राज्यातील कुपोषणाचे आकडे वाढत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Midday meal scheme in most of school in maharashtra stopped due to mess in tenders zws
First published on: 15-10-2022 at 03:40 IST