Rahul Gandhi on Mumbra Train Accident : मुंबईजवळ दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकांच्या दरम्यान आज सकाळी झालेल्या दुर्घटनेत काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जणाऱ्या लोकल रेल्वेमधून रेल्वे ट्रकवर पडल्याने पाच प्रवाशांना जीव गमवावा लागला. यानंतर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी मुंबईतील या दुर्घटनेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे
राहुल गांधी यांना ११ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काही कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे, यानिमीत्ताने देशभरात काही मोहिमा देखील राबवल्या जाणार आहे. दरम्यान यावरून टीका करताना राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मुंब्रा येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केली आहे.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधी म्हणाले की, “जेव्हा मोदी सरकार ११ वर्षांच्या सेवेचा उत्सव साजरा करत आहे, तेव्हा देशाचे वास्तव मुंबईतून रेल्वेतून पडून अनेक लोकांचा मृ्त्यू झाल्याच्या या दुख:द बातमीतून दिसून येते. भारतीय रेल्वे ही कोट्यवधी लोकांचा आधार आहे, मात्र आज ती असुरक्षितता, गर्दी आणि गैरव्यवस्थेचे प्रतिक बनले आहे. मोदी सरकारचे ११ वर्ष = जबाबदारी न स्वीकारणे, परिवर्तनाचा आभाव, फक्त प्रचार.”
“सरकार २०२५ ची चर्चा सोडून, आता २०४७ ची स्वप्ने विकत आहे. देश आज काय सहन करतो आहे, हे कोण पाहाणार? मी मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो आणि जखमी प्रवासी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो,” असेही लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
जब मोदी सरकार 11 साल की “सेवा” का जश्न मना रही है, तब देश की हक़ीक़त मुंबई से आ रही दर्दनाक ख़बर में दिखती है – ट्रेन से गिरकर कई लोगों की मौत।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 9, 2025
भारतीय रेल करोड़ों की ज़िंदगी की रीढ़ है, लेकिन आज असुरक्षा, भीड़ और अव्यवस्था की प्रतीक बन चुकी है।
मोदी सरकार के 11 साल = न…
नेमकं काय झालं?
दिवा व मुंब्रा स्थानकांच्या दरम्यान सकाळी ९.२० च्या सुमारास लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाज्यात (फूटबोर्ड) लटकत उभे होते. मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील फलाट क्रमांक ३ आणि ४ च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत आणि कासारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या लोकल गाड्यामधील प्रवासी खाली पडले. प्रथमदर्शनी दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना तसेच त्यांच्याकडील बॅगांचा धक्का लागून दोन्ही गाडीतील एकूण १३ प्रवासी गाड्यांमधून पडले. या पैकी ५ जणांचा मृत्यू झाला असून इतर जखमींवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.