छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) भारतीय इतिहासातील शूर, पराक्रमी, सहिष्णू, आदर्श शासनकर्ता राजा म्हणून ओळखले जातात. त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना आदराने शिवराय, राजे, शिवाजी महाराज म्हटले जाते. त्यांनी विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, मुघल साम्राज्याशी लढा दिला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आहे. मोघलांचं साम्राज्य असताना स्वराज्याची आस भारतात रोवणारा जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं. शिवाजी महाराजांचं राज्य संपवण्यासाठी औरंगजेबाला महाराष्ट्रात तळ ठोकावा लागला व तब्बल २७ वर्षांनी तो इथंच मरण पावला पण स्वराज्य संपवू शकला नाही. स्वराज्य प्रत्यक्षात आणतानाच जाती व धर्माधारित भेदांना थारा शिवाजी महाराजांनी कधीही दिला नाही व समस्त रयतेचा एकसमान विचार केला म्हणूनही त्यांना रयतेचा राजा संबोधण्यात येते.Read More
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेला ३६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आग्र्यात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने भव्य शौर्य सोहळ्याचे आयोजन करण्यात…
कल्याण खाडी पुलावरून भिवंडीकडे जाणाऱ्या मार्गावरील कमानीवर ‘छत्रपती’ ऐवजी ‘छत्रपत्ती’ असा चुकीचा उल्लेख झाला आहे. याबाबत शिवप्रेमी व स्थानिक नागरिकांनी…
ग्रांट डफने शिवाजी महाराजांना निरक्षर ठरवताना केवळ ऐकीव माहितीवर किंवा सदोष गृहीतकावर विश्वास ठेवला, एवढ्यापुरताच राजवाड्यांचा त्याच्यावरचा राग मर्यादित नव्हता;…