छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) भारतीय इतिहासातील शूर, पराक्रमी, सहिष्णू, आदर्श शासनकर्ता राजा म्हणून ओळखले जातात. त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना आदराने शिवराय, राजे, शिवाजी महाराज म्हटले जाते. त्यांनी विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, मुघल साम्राज्याशी लढा दिला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आहे. मोघलांचं साम्राज्य असताना स्वराज्याची आस भारतात रोवणारा जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं. शिवाजी महाराजांचं राज्य संपवण्यासाठी औरंगजेबाला महाराष्ट्रात तळ ठोकावा लागला व तब्बल २७ वर्षांनी तो इथंच मरण पावला पण स्वराज्य संपवू शकला नाही. स्वराज्य प्रत्यक्षात आणतानाच जाती व धर्माधारित भेदांना थारा शिवाजी महाराजांनी कधीही दिला नाही व समस्त रयतेचा एकसमान विचार केला म्हणूनही त्यांना रयतेचा राजा संबोधण्यात येते.Read More
छत्रपती शिवरायांच्या पादुकांचे श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात हक्कदार श्री पूजक मंडळाच्या वतीने बुधवारी स्वागत करून पादुकांवर मंत्रघोषात अभिषेक करण्यात…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील पराक्रमाची निशाणी असणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी सातारा शहरात दोन दिवस आधीच दाखल झाली आहेत.
संभाजीराजे छत्रपती यांच्या अतिक्रमण मुक्त विशाळगड मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले. विशाळगड येथे प्रक्षुब्ध जमावाने दगडफेक, जाळपोळ केली. यामध्ये काहीजण…