मुख्यमंत्री आपला असला पाहिजे यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. २०२२ मध्ये आपला पक्ष फोडला गेला. त्यावेळी मला उद्धव ठाकरेंनी सांगितलं किती मावळे आहेत बघ, त्यानंतर मी आज जिथे बोलतोय याच हॉलमध्ये बैठक घेतली. त्यावेळी बाहेर पाऊस पडत होता. मात्र या हॉलमध्ये जी बैठक झाली त्यानंतर गद्दार मुंबईत यायला घाबरत होते. पोलिसांच्या सुरक्षेत ते मुंबईत आले. त्यामुळे या हॉलची आठवण खास आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच ३०३ वरुन ते २४० वर गेले हा आपल्या देशाचा विजय आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कीर्तिकर यांचीही जागा आपण जिंकणार

मुंबईत नगरसेवक, गद्दार आमदार, खासदार पळून गेले आणि आपली यंत्रणा खेचून आपण नऊ जागा जिंकलो. निगेटिव्हमधून सुरु करत आपण नऊ जागा जिंकलो. जो पक्ष सत्तेत आहे त्यांना दुसऱ्यांकडून नेते घ्यावे लागले. जो पक्ष देशात मोठा होता त्यांनी धाडी वगैरे टाकल्या आणि तेवढं सगळं करुनही नऊच जागा इथे जिंकल्या. कीर्तिकर यांचीही जागा आपण जिंकणार आहोत. अनिल परब यांनी शब्द दिला आहे असंही आदित्य ठाकरे मुंबईतल्या मेळाव्यात म्हणाले.

आणखी काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आपल्या भाषणात आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री असेल यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. उद्या ही हेडलाईन. पुन्हा नोंदणी करण्याची पाळी येऊ देऊ नका. अर्धी निवडणूक आपल्या हाती आली आहे. निवडणुकीत सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. जी आपले लोक आहेत ती आपली जबाबदारी आहे.” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

हे पण वाचा- “ज्यांनी दिली साथ, त्यांचा करतो आम्ही घात हे भाजपाचं ब्रीदवाक्य”, आदित्य ठाकरेंचा टोला

सिनेटमध्ये सुद्धा आपण १० पैकी १० जिंकलो यामधून आपली नोंदणी जास्त असल्यामुळे विजय आपला होतो. अनिल परब यांच्या समोरच्या बॉक्समध्ये फक्त १ नंबर काढायचा आहे. उद्धवजी सांगतील जास्त मतदान पाहिजे, अनिल परब सांगतील जास्त मताधिक्य आहे. जेव्हा निवडणुकीत आपला उमेदवार ठरवायचे होते, तेव्हा सगळ्यांचे काम आणि टर्म पहिले आहेत. पोतनीस यांची टर्म संपत आहे, पण अनिल परब यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी अनेकांनी मागणी केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.

उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही

लोकांना कळलंय, उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही, अनिल परब यांच्यावर अनेक केसेस आहेत, ती सुद्धा केस स्टडी ठरू शकते. माझ्यावर एक केस आहे, दिलाईड रोडवर आम्ही गाडी चालवली. रोड सुरु केला त्याबद्दल केस घेतली आहे. आपल्या हक्कासाठी परब यांनी केस घेतल्या आहेत. भाजपकडे ही केस आहेत, पण त्यांच्याकडे रेवण्णा आहे. त्याच्यासाठी मोदींनी जाऊन प्रचार केला आहे. ही आपली विधानसभेसाठी तयारी आणि सराव आहे. काही ठिकाणी मतदान विभागले आहे, पण ही निवडणूक पक्की आहे. आता लोकांना कळलं आहे, उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray says now people have realized that there is no option but uddhav thackeray scj