सांगली : जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी करण्यात आले. काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत, भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी, शिवसेना यासह सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा : “…एका घटनेमुळे जयंत पाटलांनी आमच्याबरोबर शपथ घेतली नाही”; हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान, म्हणाले…
यंदाच्या अवर्षण परिस्थितीचे खासगी कंपनीच्या सर्वेक्षण करण्यात आले. या कंपनीने सादर केलेल्या अहवालाचा आधार घेऊन जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले. मात्र कायम दुष्काळ असलेला जत तालुका वगळण्यात आला. याचे तीव्र पडसाद तालुक्यात उमटले आहेत. जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु करावे या मागणीसाठी शुक्रवारी सर्वपक्षीय एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.