Maharashtra News Highlights: शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसेच सुमारे २२ विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून दिलेले चर्चेचे दिलेले निमंत्रण कडू यांनी स्वीकारले आहे. मात्र याबरोबरच राष्ट्रीय महामार्गावरील ठिय्या आंदोलन नियोजित ठिकाणी सुरू राहणार असल्याची घोषणाही कडू यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेत काय तोडगा निघणार हे पहावे लागणार आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून आज मेळावा घेतला जाणार आहे. ज्यामध्ये मतदार याद्यांमधील घोळाबाबत प्रझेंटेशन दिले जाण्याची शक्यता आहे.
तर मोंथा चक्रीवादळाचा परिणाम राज्यातही पाहायला मिळत आहे. चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या स्थितीत मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यास पुन्हा पावसाने झोडपले. आजही राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता आहे. या सर्व घडामोडींकडे आपले लक्ष असणार आहे.
Maharashtra Weather Today Live Updates : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
निवृत्तीवेतनाच्या भानगडी? आता त्या दूर करणारी सुविधा १ नोव्हेंबरपासून होणार उपलब्ध…
खारेगाव येथे नियंत्रक शिधावाटप विभागाची गॅस टॅंकरवर मोठी कारवाई; ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
तळोज्यात दोन हृदयद्रावक आत्महत्या; विद्यार्थिनीचा मानसिक ताण व विवाहितेचा हुंडाबळी
ठाणे महापालिकेची पाणी देयक वसुली मोहीम सुरू; थकबाकीदारांची नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई सुरू
Farmers Protest Nagpur : सरकारकडून शेतकरी आंदोलकांची फसवणूक; चर्चेचा प्रस्ताव देऊन नेत्यांना अटक
आज संध्याकाळी सात वाजता बच्चू कडू हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. यापूर्वी आंदोलकांना सबोधित करताना कडू म्हणाले की, आंदोलनात काही गोष्टी भेटल्या नाहीत तरी काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत असतात. एकदा ही वज्रमूठ उभी झाली की, यातून शेतकऱ्यांच्या आंदोलकांचं एक चांगलं भविष्य उभे राहिल अशी अपेक्षा आहे. माध्यमांनी हे आंदोलन महाराष्ट्रभर पोहचवलं, लोकांच्या मनापर्यंत नेलं. वरचा देव पावला आता खालचा देव पावतो का नाही हे आपल्याला खरंतर संध्याकाळी सात वाजता दिसणार आहोत. आंदोलनात आपण जिंकतो पण कधीकधी तहात हरत देखील असतो. एखादा निर्णय झाला तर चांगला निर्णयही कधीकधी विरोधात वाटत असतो, असं बऱ्याच आंदोलकांच्या बाबतीत आपण नेहमीच होताना पाहिलं आहे. पण आपण आंदोलन करतोय हे महत्त्वाचं आहे. निर्णय कमी जास्त होतातच. एखादा निर्णय सर्वच कार्यकर्त्यांना पटेल असे होत नाही. आंदोलनाबाबत प्रामाणिकपणा असणं महत्त्वाचं आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
आपण यश घेऊनच येऊ, नाही यश भेटलं तर आंदोलन करायला आपल्याला कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.
Nagpur Farmers Protest : शेतकरी नेत्यांचा राज्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडीमार
‘पुनर्वापरातील पाणी वापर प्रकल्पा’ने टंचाईवर मात; पनवेल महापालिकेची दीर्घकालीन उपाययोजना
कळवा रुग्णालयात वाॅर्डचे नुतनीकरण पण, प्राणवायु वाहीनीचा पत्ताच नाही; प्राणवायु वाहीनी बसविण्यासाठी निविदा काढली नसल्याने…
व्हिएतनाम येथील हिरव्या भाताची रायगडमध्ये लागवड…
तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना नाश्त्याऐवजी १० रुपयांचा बिस्कीट पुडा; ठेकेदाराकडून प्रवाशांची लूट
सुनियोजित शहरात इमारतींची अग्निसुरक्षा धोक्यात; दहा महिन्यांत आगीच्या ५९३ घटना
आपण ओबीसी नेत्यांना पत्र दिलं होतं – बच्चू कडू
आंदोलनाची सुरूवात करत असताना शेतकरी नेत्यांना एकत्रित आमंत्रित करून याची एक मोठ बांधण्याचा प्रयत्न केला. सर्व नेते एकत्र आले आणि कमी काळात आंदोलनाची तयारी आपण केली. आपण ओबीसी नेत्यांना पत्र दिलं होतं. प्रकाश आंबेडकरांना पत्र दिलं होतं. राजकीय पक्षांना देखील सगळ्यांना पत्र दिलं होतं. काँग्रेसने आपल्याला जाहीर पाठिंबा दिली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील पाठिंबा दिला, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
Naxalism in India : सविस्तर : नक्षलवाद्यांच्या पतनाचा प्रवास; चळवळीचे कुठे चुकले?
Bacchu Kadu Maha Elgar Protest Nagpur : पावसात भिजले आंदोलनस्थळ; पण नाही ढळला शेतकऱ्यांचा निर्धार
धाराशिवच्या राजकीय पटावर महायुतीतील भाजप, शिवसेनेत वादाची तिसरी घंटा
Nagpur Farmers Protest : रात्री आंदोलन स्थळी काय घडले ?
Special Trains : विशेष रेल्वे गाड्यांचा उद्यापासून परतीचा प्रवास… भुसावळ स्थानकावर केव्हा पोहोचणार ?
Bacchu Kadu Farmers Protest Nagpur : आंदोलन सुरूच ठेवून मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा; तोडगा न निघाल्यास ‘रेल्वे रोको’
बंजारा समाजाचा एसटी आरक्षणासाठी रास्ता रोको! समृद्धी महामार्गावर सुमारे ८०० पोलीस तैनात
वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव येथे आज बंजारा समाजाकडून एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावर सुमारे ८०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
#WATCH | Maharashtra: Around 800 police officers and personnel are on the Samruddhi Highway in Malegaon, Washim district, as the Banjara community is going to hold a road blockade, demanding ST reservations. pic.twitter.com/IiqrGlgtbd
— ANI (@ANI) October 30, 2025
