Maharashtra News Highlights: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (२६ सप्टेंबर) दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत. तसेच काल त्यांनी मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मदतीसंदर्भात निवेदन दिलं आहे. महापुराने बेहाल झालेल्या मराठवाड्याला मदतीचा हात देणं गरजेचं असून राज्य सरकारच्या तिजोरीत निधी नसला तरी उणे अर्थसंकल्पातून तरतुदी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर मदत दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

Live Updates

Marathi News Live Today : राज्यासह देशभरातील बातम्या वाचा एकाच क्लिकवर.

10:51 (IST) 26 Sep 2025

Attempted Murder : बाणेरमध्ये वैमनस्यातून टोळक्याकडून दोघांवर हल्ला; मारहाणीत एक युवक गंभीर जखमी

टोळक्याने केलेल्या मारहाणीत समर्थ योगेश ताम्हाणे (वय १७, रा. धनकुडे वस्ती, बाणेर) हा गंभीर जखमी झाला आहे. …वाचा सविस्तर
10:51 (IST) 26 Sep 2025

प्रांजल खेवलकरला जामीन… एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, “हा राजकारणाचा डाव…”

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी अटकेत असलेले प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर झाल्यानंतर खडसे यांनी या संपूर्ण प्रकरणाला ‘खडसे परिवाराला बदनाम करण्याचा राजकारणाचा डाव’ म्हटले आहे. …वाचा सविस्तर
10:49 (IST) 26 Sep 2025

नंदुरबारमधील आदिवासी समाजाचा उद्रेक… निमित्त एक, कारणे अनेक

बेरोजगारी, स्थलांतर आणि आरोग्य-रस्त्यांसारख्या सुविधांकडे शासनाचे दुर्लक्ष तसेच आरक्षणाच्या विषयामुळे खदखदत असलेल्या नंदुरबारमधील आदिवासी समाजाचा असंतोष जय वळवी या तरुणाच्या हत्येच्या निमित्ताने व्यक्त झाला. …अधिक वाचा
10:32 (IST) 26 Sep 2025

Competitive Exam Postpone: राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या! वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्र्यांचा आदेश

राज्यातील अनेक भागांत मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या अती मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. …अधिक वाचा
10:32 (IST) 26 Sep 2025

मिरा-भाईंदरमध्ये मोकाट जनावरांवर ३ हजारांचा दंड; महापालिकेचा निर्णय

मिरा-भाईंदर शहरात साधारणपणे पाचशेहून अधिक जनावरे असून ती काही खासगी तबेलेधारकांची आहेत. मात्र, हे तबेलेधारक आपल्या जनावरांची योग्य काळजी घेत नसल्याने ही जनावरे शहरात मुक्तपणे संचार करताना दिसतात. …सविस्तर वाचा
10:14 (IST) 26 Sep 2025

“मी वेगळ्या उद्देशाने तसं बोललो”, अजित पवारांचं ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

धाराशिवमधील पूरग्रस्तांना धीर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की “आपल्याला सगळी सोंगं आणता येतात. परंतु, पैशाचं सोंग आणता येत नाही.” यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली. या टीकेला आता त्यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “मी ग्रामीण भागात जातो तेव्हा तिथल्या लोकांना समजेल अशा भाषेत बोलत असतो. आपल्या घरी बोलली जाते तशीच भाषा वापरतो. आपण आपल्या घरातही बोलतो की ‘अरे बाबा आपल्याला सगळी सोंगं आणता येतात, परंतु पैशाची सोंगं घेता येत नाहीत.’ काही गोष्टी बजेटमध्ये बसवाव्या लागतात. तशा अर्थाने मी बोललो. परंतु, विरोधक चुकीचा अर्थ घेत आहेत. मी आधी काय बोललो, नंतर काय बोललो ते ऐकतच नाहीत. मधलं वाक्य तेवढं घेतलं आणि टीका केली.”