अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात करणारी ट्विंकल खन्ना आता एक निर्माती आणि लेखिकादेखील आहे. अभिनेत्रीची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि सर्वांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ट्विंकलने अलीकडेच सांगितले की, तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश कुटुंबाच्या अपेक्षा होत्या म्हणून केला होता.

माझ्या आईने मला अभिनेत्री व्हायला सांगितले

दिव्या जैनशी बोलताना अभिनेत्री म्हणाली होती, ‘इथल्या अनेक लोकांप्रमाणेच मलाही वाटतं की मुलेही तेच करतात, जे त्यांचे पालक करतात. जर कोणाचे मिठाईचे दुकान असेल तर तुम्ही मिठाई विक्रेता बनता. हे इतके सोपे आहे. माझ्या अभिनय कारकिर्दीबद्दल माझे आई-वडील उत्सुक होते. मी सीए प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केला होता, कारण मला तेच करायचे होते. माझ्या आईने मला सांगितले की, तू अभिनेत्री होण्याची हीच योग्य वेळ आहे आणि नंतर तू जे काही करायचे ते करू शकतेस.” ट्विंकलची चित्रपट कारकीर्द जास्त काळ टिकली नाही, तिचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. तिने सांगितले की, यामुळे तिने तिच्या आईलाही टोमणे मारले होते.

ट्विंकलने विचारले होते आईला प्रश्न

ट्विंकल म्हणाली होती, ‘तुला माहिती आहे, तू मला जबरदस्ती केलीस.’ तेव्हा मला लेखक म्हणून यशस्वी कारकीर्द घडवता आली असती. मग आई म्हणाली, “बरं आता तू काय करू शकतेस?”

दरम्यान, ट्विंकल म्हणाली की पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की ते त्यांची स्वप्ने मुलांवर लादू शकत नाहीत. मला वाटतं की एक आई म्हणून, आपल्या महत्त्वाकांक्षा आणि कल्पना बऱ्याचदा आपल्या मुलांपर्यंत पोहोचतात, पण हे करू नये. तुम्ही तुमच्या मुलाकडे पाहा, त्याची ताकद आणि कौशल्ये काय आहेत ते पाहा, यामुळे त्यांना हवे तसे करता येईल.

अक्षय कुमार आणि ट्विंकल या दोघांनीही अनेक वर्षे एकमेकांना डेट केले. २००१ मध्ये त्यांचे लग्न झाले. या जोडप्याला आरव आणि नितारा ही दोन मुले आहेत. अक्षय आणि ट्विंकल यांनी १९९९ मध्ये ‘इंटरनॅशनल’, ‘खिलाडी’ आणि ‘झुल्मी’सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. ट्विंकल अनेकदा सोशल मीडियावर तिच्या लग्नाबद्दल मजेदार पोस्ट शेअर करत असते.