मुंबई: मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे, नवी मुंबई शहरात सोमवारपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर मंगळवारीही कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने मंगळवार – बुधवारी रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यभरात सोमवारी मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. जुलै महिन्यात सुरुवातीला पावसाने ओढ घेतली होती. दरम्यान, रायगड जिल्ह्याला सोमवार ते शुक्रवार या कालावधीत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, हवामान विभागाने मंगळवारी आणि बुधवारी रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

हेही वाचा – मुंबई : बीकेसीतील दोन भूखंडांच्या ई – लिलावाच्या निविदेला मुदतवाढ

हेही वाचा – मुंबई : महारेरात पहिल्या सुनावणीनंतर पुढील तारखेबाबत अनिश्चितता! वकिलांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

रायगड जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. तसेच पालघर जिल्ह्यातही बुधवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, हवामान विभागाने आता बुधवारी पालघर जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain warning in palghar district along with raigad mumbai print news ssb