मुंबई : मुंबई शहर, तसेच उपनगरातील किमान तापमान आणि कमाल तापमान २० ते ३० अंश सेल्सिअसदरम्यान असून शहर आणि उपनगरांमध्ये आणखी काही दिवस थंडीचा मुक्काम असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी २१.८ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २१.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. शुक्रवारनंतर तापमानात एक ते दोन अंशानी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर भारतातील शीतलहरी आणि बंगालच्या उपसागरात उच्च दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दिवसा कडक उन आणि रात्री, पहाटे गारठा अनुभवायला मिळत आहे.

हेही वाचा… मुंबई : मालमत्ता करवाढ न करण्यावर स्वाक्षरी, राज्यपालांच्या सहीनंतर आता केवळ अध्यादेशाची प्रतीक्षा

हेही वाचा… ‘मास्टर लिस्ट’मधील विजेत्यांची पुन्हा पडताळणी होणार! तक्रारींमुळे म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय

राज्यात ढगाळ हवामान अनुभवायला मिळत असतानाच, उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. राज्यातील तापमानात वाढ, उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अनेक भागात कमाल तापमान ३३ अंशांच्या वर आहे. मात्र, मुंबई शहर, तसेच उपनगरातील किमान तापमान स्थिर असल्याने मुंबईकरांना आणखी काही दिवस थंडी अनुभवायला मिळेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minimum temperature will remains in coming days in mumbai mumbai print news asj