नागपूर : राज्यातील अमरावती शहरात बुधवारी रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी ३.८ तीव्रतेचा भूकंप झाला. ही माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने तसेच नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिली. मात्र, भूकंपामुळे कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाली नाही.मध्य प्रदेशातील खंडवा आणि बुरहानपूर जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. जमीन हादरताना पाहून लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. हे भूकंप बुधवारी चार जूनला रात्री नऊ वाजून ५८ मिनिटांनी झाले.

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.८ मोजण्यात आली. त्याचा केंद्रबिंदू महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात होता, जो जमिनीपासून दहा किलोमीटर खाली होता. प्रादेशिक हवामान केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर होते. हे ठिकाण खांडवापासून ६६ किलोमीटर अंतरावर होते. यामुळे दोन्ही राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी जमिनीत शिरले होते. यामुळे हवेत गोंधळ निर्माण झाला आणि त्यामुळे मध्यम तीव्रतेचे भूकंप झाले, असा अंदाज यावेळी हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला. खांडवा जिल्ह्यातील पंधना ब्लॉकमधील कोहदाद, बोरगाव आणि रुस्तमपूर यासारख्या अनेक गावांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. यासोबतच, बुरहानपूर जिल्ह्यातील नेपानगर भागातही हे भूकंपाचे धक्के जाणवले. खांडवा आणि आसपासच्या ग्रामीण भागात जसे की कोहदाद, बोरगाव आणि रुस्तमपूर येथेही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये मान्सून प्रणालीची सक्रियता वाढत आहे. यामुळे जमिनीचे तापमानही बदलत आहे. यामुळे अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे, असेही हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे.

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सूर्जी तालुक्यातील अनेक भागांत यापूर्वी देखील ३० सप्टेंबर २०२४ ला दुपारी दीड वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अनेक गावांमध्ये भूकंपाचे हादरे बसले. यामुळे काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. मेळघाटचा काही भाग, आमझरी, सातपुड्याच्या पायथ्याचा भाग, चिखलदरा, धारणी तालुक्यातील अनेक भागांत हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.२ इतकी नोंदवण्यात आली होती.