नागपूर : बदामाचे सेवन हे आरोग्यासाठी फायद्याचे आहे. रोज मुठभर बदाम खाल्यास आरोग्याला रक्तदाब, बॅड कॅलोस्ट्रोलसह इतर आजाराबाबतचे कोणते लाभ शक्य आहे, याबाबत हे आपण जाणून घेऊ या. इंडियन डायटेटिक असोसिएशन (आयडीए)ची नागपूर शाखा आणि अल्मंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया यांच्यातर्फे नागपुरातील हॉटेल सेंटर पॉइंट येथे झालेल्या चर्चासत्रात ही माहिती पुढे आली.
चर्चासत्रात न्यूट्रिशन आणि वेलनेस कन्सल्टंट शीला कृष्णस्वामी म्हणाल्या, एका अभ्यासानुसार दररोज मूठभर बदाम खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते, थोडक्यात रक्तदाब कमी होतो, वजन वाढत नाही, काही लोकांचे वजन थोडे कमी होऊ शकते आणि त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सुधारते. बदाम स्नायूंच्या पुनर्बलनास (मसल्स रिकव्हरी) आणि ताकद वाढवण्यास मदत करतात, त्यामुळे आपले आरोग्य सुधारते. बदाम पोषक तत्त्वांनी भरलेले असतात, त्यामुळे तो आरोग्यदायी नाश्ताही ठरतो, असे डॉ. कृष्णस्वामी म्हणाल्या. यावेळी डॉ. कविता गुप्ता, डॉ. रेनुका माईंदे यांनीही मार्गदर्शन केले. चर्चा सत्राचे सूत्रसंचालन डॉ. कविता बक्षी यांनी केले.
१२ आठवडे ४३ ग्राम कच्चे बदाम खाल्यामुळे…

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

चेन्नईत जास्त वजन असलेल्या आणि लठ्ठपणाने ग्रस्त अशा भारतीय प्रौढांनी सलग १२ आठवडे दररोज ४३ ग्रॅम कच्चे बदाम खाल्ल्याने इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारली, पॅन्क्रियाजचे कार्य अधिक चांगले झाले आणि एकूण कोलेस्टेरॉल कमी झाला, असे डॉ. विश्वनाथन मोहन यांनी सांगितले.

वजन नियंत्रणासाठी…

बदाम खाणाऱ्या व्यक्तींमध्ये शरीराचे वजन आणि उपाशी पोटी असलेल्या रक्तातील साखरेचे प्रमाण दोन्हीमध्ये सुधारणा दिसून आली. लठ्ठपणा हा आज एक जागतिक समस्या बनली आहे आणि तो टाइप २ डायबेटीससारख्या अनेक दीर्घकालीन आजारांचा धोका वाढवतो. त्यामुळे लोकांना योग्य आणि सोपा उपाय सुचवणे गरजेचं आहे. कमी पोषणमूल्य असलेल्या स्नॅक्सऐवजी बदाम खाण्याची सवय लावणे हे एक साधे पण प्रभावी पाऊल ठरू शकते. ते वजन नियंत्रणात ठेवायला आणि मधूमेहाचा धोका कमी करायला मदत करू शकत असल्याचे डॉ. शीला कृष्णस्वामी म्हणाल्या.

बदामातील गुणधर्म कोणते ?

फक्त २८ ग्रॅम बदामांमध्ये ६ ग्रॅम प्रोटीन, १२.४४ ग्रॅम चांगल्या प्रकारचे फॅट्स, ३.५ ग्रॅम फायबर आणि ७.२७ मिग्रॅ व्हिटॅमिन ई असते. याशिवाय, त्यामध्ये फ्लॅवोनॉइड्स आणि प्रोअँथोसायनिडिन्स यांसारख्या संयुगांमुळे अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी (दाह कमी करणारे) गुणधर्म असतात, जे आरोग्यदायी जीवनशैलीसाठी उपयुक्त ठरत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At nagpur seminar experts promote almonds for wellness and nutrition mnb 82 zws