भंडारा : जवाहरनगर आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण स्फोटात आठ जणांना प्राण गमवावे लागले, तर पाच जण गंभीर जखमी झालेत. आज अंत्यसंस्कार करण्यापूर्वी आठही मृतदेह कंपनीच्या मुख्यप्रवेश द्वराजवळ असलेल्या शेडमध्ये आणण्यात आले. एकाच रांगेत आठ मृतदेह. मन उद्विग्न करणारे ते दृश्य. स्फोटानंतर मृतांचे नातेवाईक व गावकऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला आणि घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. जोवर लिखित स्वरूपात मागण्या पूर्ण होणार नाही तोवर मृतदेह हलवणार नाही, असा आक्रमक पवित्रा कुटुंबीयांसह हजारोंच्या संख्येने जमलेल्या लोकांनी घेतला. कंपनीकडून मागण्या पूर्ण करण्याचा शब्द दिला जात नसल्याने तब्बल पाच तास आठही मृतदेह ठेवण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा