नागपूर : दिवाळीनिमित्त राज्यभरात झालेल्या रोषणाईमुळे दोन दिवसांपासून विजेची मागणी १२५ मेगावाॅटने वाढली आहे. परंतु राज्यातील काही भागात पाऊस पडत असल्याने कृषी पंपाचा वापर कमी झाला आहे. शिवाय शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विजेची मागणी स्थिर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – २८३ शिक्षकांच्या आयुष्यात यावर्षी दिवाळी लखलखली

हेही वाचा – महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून १८१ आजार वगळणार, हे आहे कारण..

दिवाळीनिमित्त राज्यभरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे विजेचा वापर सुमारे १२५ मेगावाॅटने वाढला आहे. परंतु दुसरीकडे राज्यातील काही भागांत पाऊस पडल्याने कृषी पंपाचा वापर कमी झाला आहे. सुट्यांमुळे काही उद्योग, कार्यालये, शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळेहीे विजेचा वापर कमी झाला आहे. महानिर्मितीसह विविध खासगी वीजनिर्मिती केंद्रातून वीजपुरवठा नियमित सुरू असल्याने ग्राहकांना फटका बसलेला नाही. या वृत्ताला महावितरणच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in electricity consumption due to diwali lighting but electricity demand is stable mnb 82 ssb