नागपूर : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी आणखी एक मोठा उपक्रम सुरु केला आहे. आता प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन अधिक आरामात करता यावे, यासाठी रेल्वे आरक्षणाचा अंतिम चार्ट गाडी सुटण्याच्या किमान ८ तास आधी ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना तिकीटाची अंतिम माहिती, कोच क्रमांक, सीट नंबर आणि प्रवासाची संपूर्ण योजना आधीच समजून घेता येईल.

पूर्वी ट्रेनचा अंतिम चार्ट सुटण्याच्या फक्त दोन तास आधी जाहीर होत असे. त्यामुळे प्रवाशांना अनेकदा वेळ कमी पडत असे तिकीटांची स्थिती तपासण्यासाठी, बदल करण्यासाठी किंवा प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी. तसेच तिकीट कन्फर्म न झाल्यास, पर्याय व्यवस्था करण्यासाठी देखील पुरेसा वेळ मिळणार आहे. आता या चार्टची माहिती लवकर मिळाल्याने प्रवाशांचे ताणतणाव कमी होतील आणि प्रवास अधिक सुरळीत होईल.

ट्रेनचा अंतिम चार्ट म्हणजे एक संपूर्ण आरक्षण यादी, ज्यात प्रवाशांचे नावे, त्यांचे तिकीट क्रमांक, कोच क्रमांक, ट्रेनच्या थांब्यांची वेळ आणि तिकीट उपलब्धतेची माहिती दिली जाते. हा चार्ट रेल्वे प्रशासनाकडून अधिकृतपणे भारतीय रेल्वेच्या वेबसाइटवर आणि आयआरसीटीसी ॲपवर प्रदर्शित केला जातो. त्यामुळे कोणत्याही प्रवाशाला घरबसल्या आपल्या प्रवासाची संपूर्ण माहिती सहज मिळू शकते.

ही सुविधा खास करून गर्दीच्या काळात, सणासुदीच्या मोसमात आणि पर्यटन हंगामात प्रवाशांसाठी फार उपयुक्त ठरते. प्रवाशांना प्रवासाचे व्यवस्थित नियोजन करता येते आणि आवश्यक तेव्हा तिकीट बदलीची किंवा रद्द करण्याची प्रक्रियाही अधिक वेळेत करता येते.

याशिवाय, कोरना सारख्या महामारीच्या काळात प्रवाशांनी आरोग्य व सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असते. त्यामुळे प्रवासाची संपूर्ण माहिती आधी मिळणे आणि वेळेवर आवश्यक तयारी करणे फार गरजेचे ठरते. रेल्वे प्रशासनानेही प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी अनेक उपाययोजना केल्या असून या चार्टची लवकर उपलब्धता या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतीय रेल्वेच्या या सुविधेमुळे प्रवाशांना वेळेवर आणि अचूक माहिती मिळून त्यांचा प्रवास अधिक आरामदायक, सुरक्षित आणि तणावमुक्त होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळोवेळी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट किंवा आयआरसीटीसी ॲपवरून आपल्या प्रवासाशी संबंधित अंतिम चार्ट आणि अपडेट्स तपासणे आवश्यक आहे. भारतीय रेल्वेच्या या डिजिटल उपक्रमामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक चांगला होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.