जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात आज सकाळी धुक्याचे साम्राज्य पहावयास मिळाले. रब्बी पिकांसाठी मात्र हे धुके घातक असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा चिखली मार्गावर सकाळी अगदी दहा फुटांवरचेही अंधुक दिसत असल्याने सकाळीही वाहनांचे दिवे लागले होते. यामुळे वाहतूक रेंगाळली. चिखली तालुक्यातील केळवद परिसरालाही धुक्याने विळखा घातला होता.

हेही वाचा – नागपूरमध्ये तिरंगी लढतीत भाजपापुढे कडवे आव्हान; फडणवीस, गडकरी, बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला

हेही वाचा – बुलाढाणा : नात्याला काळिमा, काकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

हा नजारा रसिकांसाठी सुखावणारा असला तरी अडीच लाख हेक्टरवरील रब्बी पिकांना व आंब्यासाठी मात्र घातकच आहे. सलग तीन दिवसांपासून असणाऱ्या या धुक्यामुळे फुलोऱ्यावर आलेल्या रब्बी पिकांची वाढ खुंटणे, किडीचा प्रादुर्भाव व उत्पादनात घट येण्याची भीती शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. गव्हाच्या ओंब्या लहान होऊन दाण्याचा आकार कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, सर्वाधिक पेरा असलेल्या हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हळद पिकालाही या धुक्याचा फटका बसला आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mist in buldhana district rabbi crops will be hit scm 61 ssb
First published on: 27-01-2023 at 14:47 IST