नीरज राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न काही काळ ऐरणीवर आला होता. गेल्या आठवडय़ात चारोटीजवळील धानिवली येथे अन्य एका अपघातात कल्याण येथील एकाच कुटुंबातील तीन प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला होता. या महामार्गावर होणाऱ्या अपघातांनंतर त्या मागील कारणांचा शोध घेताना वेगमर्यादेचे उल्लंघन अर्थात ओवरस्पीिडग असणारे वाहन अशी प्राथमिक शक्यता वर्तवली जाते. महामार्गाच्या ११० किलोमीटरच्या पालघर जिल्ह्यातील पट्टय़ात अनेक ठिकाणी वाहने भरधाव जात असताना काही ठिकाणीच अपघात का होतात याचा मात्र शोध घेतला जात नाही.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Causes of more accidents in palghar region zws
First published on: 06-12-2022 at 13:11 IST