-
‘कौन बनेगा करोडपती १४’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय क्विझ शो आहे.
-
या शोचा नवा एपिसोड प्रदर्शित झाला आहे. या एपिसोडमध्ये ऋचा पवार या स्पर्धकाला रामायणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
-
मात्र, तिला या प्रश्नाचं उत्तर माहित नसल्याने खेळ सोडावा लागला.
-
“खालीलपैकी कोणते वाल्मिकी रामायणातील कांडाचे नाव नाही?” असा तो प्रश्न होता.
-
याच्या उत्तरासाठी सुंदर कांड, वनवास कांड, युद्ध कांड आणि किष्किन्धा कांड हे चार पर्याय देण्यात आले होते.
-
या प्रश्नाचं उत्तर वनवास कांड होतं. पण हे उत्तर ऋचाला माहित नव्हतं, त्यामुळे तिने ६ लाख ४० हजारांची रक्कम घेत खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.
-
पण हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. याआधी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हालाही रामायणासंबंधी प्रश्नाचं उत्तर देता आलं नव्हतं.
-
अमिताभ बच्चन यांच्या केबीसीमध्ये रामायणा संबंधीच्या प्रश्नाचं उत्तर न देऊ शकल्यामुळे सोनाक्षी ट्रोल झाली होती.
-
कौन बनेगा करोडपती ११ मध्ये सोनाक्षीने हजेरी लावली होती. यादरम्यान ‘रामायणानुसार हनुमानाने संजीवनी बूटी कोणासाठी आणली होती?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता.
-
या प्रश्नाचे उत्तर सोनाक्षीला माहित नव्हते आणि तिने लाईफलाइनचा वापर केला होता.
-
या प्रश्नाचं उत्तर सोनाक्षीला देता आले नाही हे पाहून अमिताभ बच्चन यांनाही आश्चर्य वाटले होते.
-
“तुझ्या घराचे नाव रामायण आहे. तुझ्या वडिलांचे नाव शत्रुघ्न आहे आणि तुझ्या दोन्ही भावांची नावे लव आणि कुश आहेत.” असं बिग बी तिला म्हणाले होते.
-
यानंतर सोशल मीडियावर सोनाक्षीवर बरेच मीम्स व्हायरल झाले होते. सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आलं होतं.
-
(फोटो साभार- सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम, सोशल मीडिया)
सोनाक्षीलाही देता आलं नव्हतं रामायणासंबंधी ‘या’ प्रश्नाचं उत्तर, आता आणखी एका स्पर्धकाने सोडला खेळ
काही वर्षांपूर्वी सोनाक्षी सिन्हालाही रामायणासंबंधी प्रश्नाचं उत्तर देता आलं नव्हतं.
Web Title: Kbc 14 even sonakshi sinha fail to answer the question now one more contestant leave the game mrj