-
बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरचा आज वाढदिवस आहे. नम्रता आज तिचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
२२ जानेवारी १९७२ रोजी एका मराठी कुटुंबात नम्रताचा जन्म झाला. १९९३ मध्ये मिस इंडियाचा ताज जिंकून नम्रता पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आली होती. त्यानंतर तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले.
-
दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून महेश बाबूशी लग्न केल्यानंतर नम्रताने सिनेसृष्टीला रामराम केला.
-
आता तब्बल १७ वर्षांनी नम्रताने चित्रपटसृष्टीपासून लांब जाण्यामागचे कारण सांगितले आहे.
-
नुकतंच नम्रताने तिने लग्नानंतर करिअर का सोडले याबद्दलचे कारण सांगितले आहे.
-
एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या निर्णयाचा खुलासा केला.
-
“मी खूप आळशी होते. मी नेहमी ठरवायचे त्याप्रमाणे काहीही घडायचं नाही. जे काही घडलं ते आपोआप घडलं.”
-
“पण मी जे निर्णय घेतले ते योग्य होते आणि मी त्यात आनंदी आहे, असं मला वाटते.”
-
“मला मॉडेलिंगचा कंटाळा आल्यामुळे मी अभिनय क्षेत्रात आले. मॉडेलिंगनंतर अभिनय ही पुढची पायरी होती.”
-
“त्यानंतर मी माझ्या कामाचा आनंद घेऊ लागले.”
-
“अभिनयाला गांभीर्याने घेऊ लागले तेव्हा मला महेश भेटला. आमचं लग्न झालं.”
-
“त्यामुळे जर तेव्हा मी माझं काम गांभीर्याने घेतलं असतं तर माझं आयुष्य आतापेक्षा खूप वेगळं असतं.”
-
“पण मी काही तक्रार करत नाही.”
-
“महेश आणि मी लग्न करण्याचा निर्णय घेतला तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता.”
-
“त्यानंतर माझं सगळं जगच बदलून गेलं. मला लग्नाचा अनुभव चांगला वाटत होता.”
-
“त्यामुळे मी कोणताही चुकीचा निर्णय घेतला असे मला वाटत नाही”, असेही नम्रताने म्हटले.
-
दरम्यान महेश-नम्रताने चार वर्ष एकमेकांना डेट करत होते.
-
नम्रता आणि महेश बाबू यांनी २००५ मध्ये त्यांच्या ‘अथाडू’ चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर लग्न केलं.
-
लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली. मात्र महेश बाबू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार झाला.
-
नम्रता सध्या कुटुंबासह हैदराबादमध्ये राहते. ती आता चित्रपट निर्माती बनली आहे.
“महेश आयुष्यात आला आणि…” नम्रता शिरोडकरने चित्रपटसृष्टीपासून लांब जाण्याच्या प्रश्नावर दिलेले थेट उत्तर
नम्रता सध्या कुटुंबासह हैदराबादमध्ये राहते. ती आता चित्रपट निर्माती बनली आहे.
Web Title: Namrata shirodkar comment on quitting acting after marriage to mahesh babu nrp