• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tejashri pradhan and subodh bhave on late marriages says it is their decision at what age they want to get married nsp

उशिरा लग्न करणाऱ्यांबाबत तेजश्री प्रधान व सुबोध भावे म्हणाले, “त्यांचा संसार…”

Tejashri Pradhan Subodh Bhave on late marriages: “लग्नाचे वय आता…”, अभिनेत्री तेजश्री प्रधान काय म्हणाली?

August 30, 2025 16:52 IST
Follow Us
  • tejashri pradhan
    1/9

    सुबोध भावे व तेजश्री प्रधान यांची प्रमुख भूमिका असलेली’ वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही मालिका सुरू होण्याआधी पत्रकार परिषद पार पडली. त्यादरम्यान या दोन्ही कलाकारांनी विविध चॅनेल्सना मुलाखती दिल्या. (फोटो सौजन्य: तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)

  • 2/9

    एका मुलाखतीत सध्या अनेक जण उशिरा लग्न करत आहेत, यावर तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांनी वक्तव्य केले आहे. या दोन्ही कलाकारांनी नुकतीच ‘कलाकट्टा’ला मुलाखत दिली. (फोटो सौजन्य: तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)

  • 3/9

    या मुलाखतीत त्यांना विचारले की, मालिका उशिरा लग्न करण्याबाबत भाष्य करतेय, तर तुम्हाला काय वाटतंय? यावर तेजश्री म्हणाली, “कदाचित आताच्या काळातील तो गरजेचा विषय आहे, कारण पूर्वीच्या काळापासून चालत आलेले लग्नाचे वय आता पुढे सरकताना दिसत आहे.” (फोटो सौजन्य: तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)

  • 4/9

    “करिअर आणि इतर गोष्टी, सध्याची स्पर्धा पाहता आजच्या काळात लोकांची लग्नं उशिरा होत आहेत, त्यामुळे साधर्म्य असणारा कंटेंट लोकांना आवडतो; त्यामुळे मला वाटतं की ही मालिका लोकांना आवडेल.” (फोटो सौजन्य: तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम)

  • 5/9

    सुबोध भावे म्हणाले, “काही लोकांचं असं नाहीये की त्यांना लग्न करायचे नाही, त्यांना करायचं असतं; पण दुर्देवाने परिस्थितीमुळे बिचारे ते पिचलेले असतात की त्यांच्या मनातील स्वप्ने तशीच राहून जातात.” (फोटो सौजन्य: सुबोध भावे इन्स्टाग्राम)

  • 6/9

    “घरची कारणं, गरिबी, आजारपण अशी काहीही कारणं असू शकतात. कदाचित ज्या काळात त्यांना लग्न करायचं असेल तेव्हा त्यांना हवा तसा जोडीदार मिळत नसेल. काही वर्षे त्यात घालवल्यानंतर रस निघून जात असेल. (फोटो सौजन्य: सुबोध भावे इन्स्टाग्राम)

  • 7/9

    “अगदी कमी लोक असतील की ज्यांनी असं ठरवलेलं असेल की त्यांना लग्न करायचं नसेल. पण, बाकी लोकांना परिस्थितीमुळे लग्न करणे शक्य झाले नसेल आणि अशा लोकांनी आयुष्याच्या नंतरच्या काळात लग्न केलं, तर त्यावर कोणाला समस्या असण्याचं कारण नाही.” (फोटो सौजन्य: सुबोध भावे इन्स्टाग्राम)

  • 8/9

    “कारण ते काही लग्नासाठी इतर कोणाकडून पैसे घेऊन लग्न करत नाही किंवा त्यांचा संसार तुम्हाला चालवायला सांगतात असंही नाही. ते त्यांचं बघतील. त्यांनी कुठल्या वयात लग्न करायचं हा त्यांचा निर्णय आहे.” (फोटो सौजन्य: सुबोध भावे इन्स्टाग्राम)

  • 9/9

    “ते बिचारे जर घरगुती परिस्थितीमुळे किंवा काही समस्यांमुळे लग्न लवकर करू शकले नसतील, तर आनंद मिळवण्याचा त्यांचा हक्क नाहीये का? एक जोडीदार मिळवण्याचा त्यांना हक्क नाही का?”, असे म्हणत सुबोध भावे यांनी त्यांचे मत व्यक्त केले.” (फोटो सौजन्य: सुबोध भावे इन्स्टाग्राम)

TOPICS
तेजश्री प्रधानTejashree PradhanमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Tejashri pradhan and subodh bhave on late marriages says it is their decision at what age they want to get married nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.