• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. healthy food eating tips did the habit of not eating salt become the cause of sridevi death know the serious disadvantages of stopping salt intake pvp

मीठ न खाण्याची सवय ठरली श्रीदेवीच्या मृत्यूचे कारण? जाणून घ्या मिठाचे सेवन बंद करण्याचे गंभीर तोटे

मिठाच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक आजार होऊ शकतात. जर आपण आपल्या आहारातून मीठ पूर्णपणे काढून टाकले तर शरीराचे काय नुकसान होऊ शकते, ते जाणून घेऊया.

Updated: October 3, 2023 16:56 IST
Follow Us
  • serious-disadvantages-of-stopping-salt-intake
    1/12

    बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे 2018 साली निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देश हादरला होता. त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल पाच वर्षांनी त्यांचे पती आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी काही खुलासे केले आहेत. (sridevi.kapoor/Instagram)

  • 2/12

    बोनी कपूर यांनी सांगितले की हा नैसर्गिक मृत्यू नसून अपघात होता. त्यांनी पुढे सांगितले की, ‘श्रीदेवी काटेकोर आहार घ्यायच्या. त्यांचा आहार अनेकदा मीठाशिवाय असायचा, ज्यामुळे त्या कधीकधी बेशुद्धही व्हायच्या. (sridevi.kapoor/Instagram)

  • 3/12

    डॉक्टरांनीही त्यांना सांगितले होते की कमी रक्तदाबाची समस्या असल्याने त्यांनी आहारात मिठाचा समावेश करावा. (sridevi.kapoor/Instagram)

  • 4/12

    एकदा या डाएटमुळे त्या बाथरूममध्ये बेशुद्ध पडल्या तेव्हा त्यांचा एक दातही तुटला होता. मात्र असे असतानाही त्यांनी डॉक्टरांचे म्हणणे ऐकले नाही आणि शेवटी त्याचा मोठा अपघात झाला. (sridevi.kapoor/Instagram)

  • 5/12

    मिठाच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक आजार होऊ शकतात. जर आपण आपल्या आहारातून मीठ पूर्णपणे काढून टाकले तर शरीराचे काय नुकसान होऊ शकते, ते जाणून घेऊया. (Freepik)

  • 6/12

    मीठामध्ये सोडियम असते. सोडियम शरीरात पाण्याची योग्य पातळी राखण्यास मदत करते. हे पाणी सर्व अवयवांना ऑक्सिजन आणि इतर पोषक द्रव्ये पोहोचवण्यास मदत करते. मिठाचे सेवन पूर्णपणे बंद केल्यास शरीरातील जवळपास सर्वच अवयवांना इजा होऊ शकते. (Freepik)

  • 7/12

    शरीरात सोडियमच्या कमतरतेमुळे ऑस्टियोपोरोसिसची समस्या उद्भवू शकते. म्हणजेच यामुळे हाडे कमकुवत होतात आणि किरकोळ जखमा होऊन फ्रॅक्चर होऊ शकते. (Freepik)

  • 8/12

    आहारातील मिठाचे प्रमाण कमी केल्याने किंवा पूर्णपणे बंद केल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो. श्रीदेवी यांनाही कमी रक्तदाबाचा त्रास होता. (Freepik)

  • 9/12

    मिठाच्या कमतरतेमुळे टाइप 2 मधुमेह होऊ शकतो. (Freepik)

  • 10/12

    आहारातील मिठाचे प्रमाण कमी केल्यास अशक्तपणा, उलट्या, चक्कर येणे आणि थकवा येऊ शकतो. (Freepik)

  • 11/12

    मिठाच्या कमतरतेमुळे मेंदू आणि हृदयामध्ये सूज येऊ शकते, ज्यामुळे डोकेदुखी, व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकते आणि झटका देखील येऊ शकतो. (Freepik)

  • 12/12

    डब्ल्यूएचओच्या मते, प्रौढ व्यक्तीला 5 ग्रॅमपेक्षा कमी म्हणजे दररोज फक्त एक चमचे मीठ आवश्यक आहे. तथापि, जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने लोकांना अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शरीरात मिठाचे योग्य संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. (Freepik)

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Healthy food eating tips did the habit of not eating salt become the cause of sridevi death know the serious disadvantages of stopping salt intake pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.