• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. 5 best and unforgettable train journey to not miss in india jshd import sgk

निळाशार समुद्र ते वाळवंटातील सफारी;भारतातील ‘हे’ पाच रेल्वे प्रवास तुम्हाला देतील सर्वोत्कृष्ट अनुभव

भारतीय रेल्वेचं जाळं विस्तारलेलं आहे.त्यामुळे तुम्हाला केवळ प्रेक्षणीय दृश्यच दिसत नाहीत तर तुमचा प्रवा अनुभवही संस्मरणीय बनवतो. येथे आम्ही तुम्हाला भारतातील ५ सर्वोत्तम रेल्वे प्रवासांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा तुम्ही एकदा अनुभव घ्यावा.

January 11, 2025 16:25 IST
Follow Us
  • Best Train Journeys in India
    1/7

    भारत एक असा देश आहे जिथे तिथली विविधता आणि नैसर्गिक सौंदर्य रेल्वे प्रवासातून अनुभवता येते. रेल्वे प्रवास हा एक स्वस्त आणि सोयीस्कर मार्ग तर आहेच, परंतु भारताचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जवळून पाहण्याची उत्तम संधी देखील प्रदान करतो. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)

  • 2/7

    भारतीय रेल्वेचं जाळं विस्तारलेलं आहे.त्यामुळे तुम्हाला केवळ प्रेक्षणीय दृश्यच दिसत नाहीत तर तुमचा प्रवा अनुभवही संस्मरणीय बनवतो. येथे आम्ही तुम्हाला भारतातील ५ सर्वोत्तम रेल्वे प्रवासांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा तुम्ही एकदा अनुभव घ्यावा. (फोटो स्त्रोत: पेक्सेल्स)

  • 3/7

    तामिळनाडू ते रामेश्वरम
    तामिळनाडू ते रामेश्वरम हा रेल्वे प्रवास हा भारतातील सर्वात रोमांचक आणि अद्भुत प्रवासांपैकी एक आहे. हा प्रवास समुद्राच्या मध्यभागी बांधलेल्या पांबन पुलावरून जातो. या पुलावरून ट्रेनने प्रवास करताना आजूबाजूला फक्त निळा समुद्र दिसतो. हे दृश्य प्रत्येक प्रवाशांना आयुष्यभर संस्मरणीय राहते आणि हा प्रवास स्वप्नवत वाटतो.

  • 4/7

    जैसलमेर ते जोधपूर
    राजस्थानच्या वाळवंटात असलेल्या जैसलमेर ते जोधपूर या रेल्वे प्रवासाला ‘डेझर्ट क्वीन’ म्हणतात. हा रेल्वे प्रवास तुम्हाला थारच्या वाळवंटाची अनोखी दृश्ये दाखवतो. प्रवासादरम्यान तुम्हाला सोनेरी वाळूचे ढिगारे, उंटांच्या ताफा आणि विस्तीर्ण ग्रामीण भाग अनुभवता येतो. या प्रवासात तुम्हाला वाळवंट, किल्ले आणि राजवाडे यांचे विलक्षण नजारे पाहायला मिळतात.

  • 5/7

    कालका ते शिमला
    कालका ते शिमला हा प्रवास हिरवेगार डोंगर आणि हिमालयाच्या कुशीत वसलेल्या बोगद्यांमधून जातो. या ट्रेनला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. या ९६ किलोमीटर लांबीच्या प्रवासात १०० हून अधिक बोगदे आणि ८०० हून अधिक पुलांमधून जाणे हा एक अद्भुत अनुभव आहे.

  • 6/7

    मुंबई ते गोवा
    अरबी समुद्राजवळून जाणारा मुंबई ते गोवा हा रेल्वे प्रवास एक रोमांचक अनुभव आहे. या प्रवासात हिरवळ, नद्या, धबधबे आणि छोटी गावे यांचे सुंदर नजारे पाहता येतात. हा प्रवास अतिशय सुंदर होतो, विशेषतः पावसाळ्यात, जेव्हा सगळीकडे हिरवळ असते.

  • 7/7

    मेट्टुपालयम ते उटी
    निलगिरी माउंटन रेल्वे ही भारतातील सर्वात जुनी आणि प्रसिद्ध रेल्वे प्रवासांपैकी एक आहे. हा प्रवास दाट जंगले, चहाचे मळे आणि हिरवेगार डोंगर यातून मेट्टुपालयम ते उटीपर्यंत जातो. ट्रेनच्या वाफेच्या इंजिनाची शिट्टी आणि वळणदार मार्ग यामुळे हा प्रवास आणखीनच रोमांचक होतो. या रेल्वे मार्गाचा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केला आहे आणि तो अरुंद ट्रॅक आणि कलते चढणांसाठी प्रसिद्ध आहे.

TOPICS
प्रवासTravelमराठी बातम्याMarathi Newsरेल्वेRailwayरेल्वे प्रवासीRailway Passengers

Web Title: 5 best and unforgettable train journey to not miss in india jshd import sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.