-
रोहित शर्मा आणि शिखर धवन ही भारताची सलामीची जोडी चांगल्या फॉर्मात आहे. दोन्ही फलंदाजांना सूर सापडला तर त्यांना थांबवणं भल्या-भल्यांना शक्य होत नाही, त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
-
केदार जाधवच्या संघातील सहभागावरुन अनेक शंका होती. मात्र रवाना होण्याआधी फिजीओ पॅट्रीक फराहत यांनी केदार तंदुरुस्त असल्याचा अहवाल देत केदारच्या सहभागावर मोहर उमटवली.
-
रोहित आणि कुलदीप यादवसोबत केदार जाधव.
-
लोकेश राहुलला या विश्वचषकात पर्यायी सलामीवीराची भूमिका बजावायची आहे.
-
विमान पकडण्याआधी मोहम्मद शमी, शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार विमानतळावर आपला वेळ घालवताना.
-
आजकाल सर्वांवर पब-जी या खेळाचं गारुड निर्माण झालंय. मग यातून आपले क्रिकेटक कसे बरं सुटतील. धोनी, चहल आणि अन्य खेळाडू यावेळी आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असलेले दिसले.
विश्वचषकासाठी ‘विराट’सेना साहेबाच्या देशात रवाना
भारताची सलामीची लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध
Web Title: Cricket world cup 2019 team india under leadership of virat kohli leaves for england