• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. which teams loss first five matches in ipl mumbai indians royal challengers bangalore prd

मुंबईचा सलग ५ सामन्यांमध्ये पराभव, IPLच्या इतिहासात असं आणखी कोणत्या संघांसोबत घडलं?

सध्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईची स्थिती दयनीय झाली आहे. मुंबईने सुरुवातीचे पाच सामने गमावले आहेत. सध्या हा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे.

April 16, 2022 19:18 IST
Follow Us
  • आयपीएलच्या पंधराव्या हंगामामध्ये मुंबई इंडियन्स संघाचा सलग पाच सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. या हंगामात नव्याने आलेल्या दोन संघांनीदेखील मुंबईला मागे टाकलंय. आयपीएलच्या इतिहासात मुंबईसारखी स्थिती आणखी कोणत्या संघाची झालेली आहे ते जाणून घेऊया.
    1/7

    आयपीएलच्या पंधराव्या हंगामामध्ये मुंबई इंडियन्स संघाचा सलग पाच सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. या हंगामात नव्याने आलेल्या दोन संघांनीदेखील मुंबईला मागे टाकलंय. आयपीएलच्या इतिहासात मुंबईसारखी स्थिती आणखी कोणत्या संघाची झालेली आहे ते जाणून घेऊया.

  • 2/7

    आयपीएल क्रिकेटमध्ये २०१२ साली डेक्कन चार्जेस या संघाची मुंबईसारखी स्थिती झाली होती. डेक्कन चार्जेस संघाने मुंबईसारखेच सलग चार सामने गमावले होते. एकूण १६ सामन्यांपैकी या संघाला फक्त चार सामने जिंकता आले होते.

  • 3/7

    यापूर्वी दिल्ली डेअरडेविल्स म्हणून ओळख असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाचीही २०१३ साली अशीच स्थिती झाली होती. या संघाने २०१३ मध्ये सुरुवातीचे सहा सामने गमावले होते. तर या संघाला एकूण १६ सामन्यांपैकी फक्त ३ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला होता. २०१३ च्या आयपीएलमध्ये हा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर होता.

  • 4/7

    मुंबई इंडियन्सची यापूर्वी दोन वेळा अशीच दयनीय स्थिती राहिलेली आहे. २०१४ साली मुंबई संघाने एकापाठोपाठ सलग पाच सामने गमावले होते. मात्र यानंतर मुंबईने एकूण १४ सामन्यांपैकी सात सामने जिंकत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं.

  • 5/7

    २०१५ सालीदेखील मुंबईची अशीच स्थिती झाली होती. या हंगामात मुंबईने सलग चार सामने गमावले होते. तर एकूण १४ पैकी या संघाने ८ सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. या वर्षी मुंबईने जेतेपद पटकावले होते.

  • 6/7

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचीदेखील २०१९ च्या हंगामात मुंबईसारखीच स्थिती झाली होती. या हंगामात बंगळुरुने सलग सहा सामने गमावल्यामुळे संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर होता.

  • 7/7

    तर सध्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईची स्थिती दयनीय झाली आहे. मुंबईने सुरुवातीचे पाच सामने गमावले आहेत. सध्या हा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे.

TOPICS
आयपीएल २०२२ (IPL 2022)IPL 2022आयपीएल २०२५IPL 2025मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)Mumbai Indians

Web Title: Which teams loss first five matches in ipl mumbai indians royal challengers bangalore prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.