Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. i know where my game stands would not have come this far in international cricket without ability to counter situations virat kohli scsg

‘तीन वर्षांत एकही शतक नाही’ या प्रश्नावर विराट कोहली स्पष्टच बोलला; Ind vs Pak सामन्याआधी म्हणाला, “यातून बाहेर पडण्यासाठी…”

प्रदीर्घ अपयशाचा उल्लेख करत विराट कोहलीने यासंदर्भात भाष्य केलं आहे.

Updated: August 25, 2022 17:32 IST
Follow Us
    I know where my game stands would not have come this far in international cricket without ability to counter situations Virat Kohli
    गेल्या तीन वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला शतकी खेळी करता आलेली नाही.
  • 1/18

    स्टार स्पोर्टस’च्या ‘गेम प्लान’ या कार्यक्रमात आशिया कपच्या पार्श्वभूमीवर कोहलीला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

  • 2/18

    भारत आणि पाकिस्तानदरम्यान २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या हाय व्होल्टेज सामन्याआधीच विराटने आपल्या कामगिरीसंदर्भात स्पष्टपणे काही गोष्टी सांगितल्या आहेत.

  • 3/18

    तीन वर्ष शतक झळकावता आलं नाही याबद्दल विचारलं असता, ‘‘या गोष्टींचा विचार करत बसणे मला पटत नाही,” असं उत्तर विराटने दिलं.

  • 4/18

    “माझे तंत्र चुकत असल्याचीही चर्चा आहे. पण, असं काही नाहीय,” असंही विराटने यावेळी स्पष्ट केलं आहे.

  • 5/18

    “माझा खेळ कसा आहे आणि मी कसा खेळतोय, याची मला पूर्ण माहिती आहे,” असं त्याने स्पष्टपणे सांगितलं.

  • 6/18

    “वेगवेगळ्या गोलंदाजांचा सामना करण्याची आणि परिस्थितीनुसार खेळण्याची क्षमता माझ्यात होती म्हणूनच मी आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी वर्षे टिकू शकलो,’’ असंही विराट म्हणाला.

  • 7/18

    ‘माझ्याकडे क्षमता होती, त्यानुसार मी त्यावर मात केली,” असं विराटने आत्मविश्वासाने सांगितलं.

  • 8/18

    “या कालावधीने मला वेगळाच अनुभव दिला. मला काय करता येऊ शकते, हे शिकायला मिळाले,” असं विराटने या बॅड पॅचबद्दल मत व्यक्त केलं.

  • 9/18

    क्रिकेटमधील माझ्या प्रदीर्घ अपयशाचे खास असे कारण नाही, असं विराटने म्हटलं आहे.

  • 10/18

    मात्र परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता नसती, तर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकलोच नसतो, असंही त्याने आपली बाजू मांडताना सांगितलं.

  • 11/18

    “माझ्यासाठी हे सगळे सोपे होते. मला आणखी शिकायचे आहे,” असंही त्याने सांगितलं.

  • 12/18

    “आशिया चषकासाठी मी सज्ज झालो आहे. माझ्यासमोर सातत्य दाखवण्याचे आव्हान आहे,” असंही माजी कर्णधाराने म्हटलं आहे.

  • 13/18

    “यातून बाहेर पडण्यासाठी आजपर्यंतचा अनुभव कामी येईल,’’ असा विश्वासही कोहलीने व्यक्त केला.

  • 14/18

    “एक खेळाडू आणि माणूस म्हणून माझे महत्त्व काय आहे, ते मला समजून घ्यायचे आहे,” असंही विराट म्हणाला.

  • 15/18

    भारत आणि पाकिस्तानमधील सामना २८ ऑगस्ट रोजी असून दुबईमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे.

  • 16/18

    भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता हा सामना खेळवला जाणार आहे.

  • 17/18

    विराट या सामन्यामध्ये कसा खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. विराटने व्यक्त केलेला विश्वास पाहता तो या मालिकेत कमबॅक करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket Newsविराट कोहलीVirat Kohli

Web Title: I know where my game stands would not have come this far in international cricket without ability to counter situations virat kohli scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.