-
अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावासाने काल मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार हजेरी लावल्यानंतर, आज सकाळपासून देखील रिपरिप सुरू केली आहे. यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. (सर्व फोटो – निर्मल हरिंद्रन)
-
संततधारेमुळे शहराच्या अनेक भागांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने नोकरदारांबरोबरच छोट्या मोठ्या व्यावसायिकांना देखील याचा फटका बसल्याचे दिसून आले.
-
अनेक भागांमध्ये तर मुलं रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात पोहताना दिसत आहेत.
-
जलमय झालेल्या रस्त्यांवरून मार्ग काढताना चाकरमान्यांची तारांबळ होत आहे.
-
वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याने, नोकरदार मंडळींना पाण्यातून कसतर करत मार्ग काढावा लागत आहे.
-
मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
-
मुंबईत झालेल्या पावसाने ३८ ठिकाणी रस्त्यांवर पाणी आले. त्यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांचा खोळंबा झाला.
-
समुद्राला मोठी भरती येणार असून यावेळी ४.५ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.
-
काही ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे नोकरदारांसह नागरिाकाचे चांगलेच हाल झाले.
-
मुंबईत झालेल्या पावसाने ३८ ठिकाणी रस्त्यांवर पाणी आले. त्यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांचा खोळंबा झाला.
-
पालिकेने आपल्या २४ विभाग कार्यालयांसह संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
-
अंधेरी सबवे आणि किंग्ज सर्कल भागात तुलनेने जास्त पाणी होते.
-
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ७ जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी असणार आहे.
-
पुढील एक ते दोन दिवसांत कोकण विभागात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
-
राज्याच्या किनारपट्टीवर या काळात सोसाटय़ाचा वारा वाहणार आहे.
-
संग्रहीत छायाचित्र
-
-
हवामान विभागाने मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड व नाशिक या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.
मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा, अनेक भागांमधील रस्ते जलमय
समुद्राला मोठी भरती येणार असून, ४.५ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता
Web Title: Alert for heavy rains in mumbai msr