-
भारतीय मिठाईंचे जग खूप समृद्ध राहिले आहे. प्रत्येक राज्य, प्रत्येक सण, प्रत्येक परंपरेशी कोणती ना कोणती खास मिठाई जोडलेली होती, ज्यामध्ये चवीसोबतच संस्कृतीचा गोडवाही होता. परंतु बदलता काळ, गर्दीच्या बाजारपेठा आणि बदलत्या फास्ट जीवनशैलीमुळे अनेक पारंपरिक मिठाया आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. (Photo Source: Unsplash)
-
एकेकाळी प्रत्येक घरात बनवले जाणारे हे गोड पदार्थ आता पुस्तकांमध्ये व वडीलधाऱ्यांच्या आठवणींमध्ये किंवा मंदिरात प्रसाद म्हणून मिळतात. चला जाणून घेऊया अशाच ८ देशी गोड पदार्थांबद्दल जे एकेकाळी आपल्या सणांचा प्राण होते, पण आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. (Photo Source: Unsplash)
-
बाबरू – हिमाचल प्रदेश
गहू आणि गुळापासून बनवलेला हा गोड पदार्थ स्थानिक डोनटसारखा दिसतो. खास प्रसंगी आणि सणांमध्ये बाबरू तळला जात असे, पण आता शहरीकरण आणि बदलत्या खाण्याच्या सवयींमुळे लोकांच्या ताटातून हा गोड पदार्थ गायब झाला आहे. (Photo Source: Veing Himachali/Facebook) -
अधिरसम- तामिळनाडू
आंबलेल्या तांदळाच्या पिठापासून आणि गुळापासून बनवलेला हा गोड पदार्थ एकेकाळी तमिळ कुटुंबांमध्ये एक विशेष विधी मानला जात असे. परंतु तो बनवण्याच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे आणि बाजारात उपलब्ध असलेल्या आयत्या मिठाईंमुळे, तो आता दुर्मिळ होत चालले आहे. -
पुथरेकुलू – आंध्र प्रदेश
तांदळाच्या स्टार्चपासून बनवलेला हा पातळ गोड पदार्थ आत गूळ आणि तूपाने भरलेला असतो. त्याची चव खूप छान असली तरी ती वेळखाऊ असते आणि त्याला बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पुथरेकुलू आता प्रामुख्याने मंदिरांपुरते मर्यादित राहिले आहे आणि घरी बनवणे कठीण झाले आहे. (Photo Source: dadus) -
चनार जिलिपी – बंगाल
कॉटेज चीजपासून बनवलेली ही मऊ जिलिपी पारंपारिक जिलेबीपेक्षा वेगळी आहे आणि अधिक चवदार आहे. बंगालमधील मिठाईच्या दुकानांमध्ये ती सर्वत्र मिळत होती पण आता ती दुर्मिळ झाली आहे. (Photo Source: Yummy Recipes/Facebook) -
खरवस – महाराष्ट्र
खरवस हे गाईच्या पहिल्या दुधापासून (कोलोस्ट्रम) बनवलेले एक अनोखे कस्टर्डसारखे मिष्टान्न आहे, जे आरोग्यदायी आणि स्वादिष्ट आहे. बदलत्या दुग्धजन्य पद्धतींमुळे हा अनोखा गोड पदार्थ आता दुर्मिळ होत चालला आहे. (Photo Source: Swayampurna Goa) -
साटा – महाराष्ट्र आणि गोवा
साटा हा एक पारंपरिक गोड पदार्थ आहे, जो खुसखुशीत असतो. हा पदार्थ मुख्यत्वे उन्हाळ्याच्या दिवसात बनवला जातो, पण आता तो पाहायला मिळत नाही. (Photo Source: Chitra Chellani/Facebook) -
परवल मिठाई – उत्तर प्रदेश
परवल नावाच्या भाजीपासून बनवली जाणारी ही एक पारंपारिक भारतीय मिठाई आहे, जी विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रसिद्ध आहे. (Photo Source: Vecteezy) -
आले पाक – ओडिशा
जगन्नाथ मंदिरात गूळ आणि तांदूळापासून बनवलेला हा गोड पदार्थ प्रसाद म्हणून दिला जातो. आता तो धार्मिक महत्त्वापुरता मर्यादित आहे आणि सामान्य लोकांच्या स्वयंपाकघरातून जवळजवळ गायब झाला आहे. (Photo Source: Saucepans and Spices) -
(Photo Source: Unsplash) हेही पाहा- “…मी कृतज्ञ आहे”; युजवेंद्र चहलच्या मुलाखतीनंतर धनश्री वर्मा दुबईत, सोशल मीडियावर व्यक्त केली भावना, चाहते म्हणाले, “शांतपणे दिलेलं उत्तर…”
प्रत्येक सणाला घरोघरी बनवले जाणारे ‘हे’ ८ भारतीय गोड पदार्थ आता नामशेष होण्याच्या मार्गावर, महाराष्ट्रातील २ पदार्थांचाही समावेश…
Forgotten Indian Sweets: भारताच्या समृद्ध गोड संस्कृतीमध्ये काही खास गोड पदार्थ आहेत जे एकेकाळी सण आणि विशेष प्रसंगी प्रत्येक घरामध्ये बनवले जात होते. हे स्वादिष्ट पदार्थ प्रत्येकाला केवळ आवडत नव्हते, तर ते परंपरेनुसार पिढ्यानपिढ्या बनवले गेले. पण काळानुसार, हे गोड पदार्थ आता हळूहळू नामशेष होत चालले आहेत…
Web Title: 8 indian sweets that are disappearing from festive menus and are almost extinct 2 from maharashtra spl