मुंबई : लोकसभा निवडणुकीत संविधान आणि देश वाचविण्यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी अग्रणी भूमिका निभावली होती. आजवर देशाला नवनवीन योजना, संकल्पनांचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या या राज्यात महायुतीने राजकीय नीतीमत्ता धुळीस मिळविली असून निवडणुका कशा नसाव्यात, याचा दाखलाच हे सरकार देशासमोर देत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील सुजाण आणि सजग मतदार या निवडणुकीच्या माध्यमातून देशाच्या राजकारणाची पुढची दशा आणि दिशा निश्चित करेल, असा विश्वास ‘भारत जोडो अभियाना’चे राष्ट्रीय समन्वयक योगेंद्र यादव यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘भारत जोडो अभिनायन’मधील सर्व संघटनांनी राज्यात महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असून १४५ जागांवर लक्ष्य केंद्रीत करून निवडणुकीचे काम सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. अणुशक्तीनगर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उमेदवार फाहद अहमद यांना ‘भारत जोडो अभियान’ने पाठिंबा दिला आहे. यावेळी यादव यांच्यासह अभियानाचे राष्ट्रीय सचिव संजय गोपाळ, राज्य समन्वयक उल्का महाजन आणि फाहद अहमद यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा >>>Constituencies In Yavatmal District : यवतमाळ जिल्ह्यात जातीय समीकरणेच ठरणार निर्णायक

‘भारत जोडो अभियाना’ने लोकसभा निवडणुकीत राज्यातील २३ मतदारसंघात काम केले होते. त्यापैकी तब्बल १८ मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. आता विधानसभेत १४५ मतदार संघात आमचे काम सुरू असून महाविकास आघाडीमधील घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीचे नियोजन, प्रचार रणनीती याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogendra yadav belief of bharat jodo abhiyaan about maharashtra politics print politics news amy