गुवाहाटीला जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला होता. दिव्यांग मंत्रालय करा तरच मी तुमच्यासोबत येणार अशी अट आमदार बच्चू कडू यांनी घातली होती, अशी माहिती बच्चू कडू यांनी आज पिंपरी-चिंचवडमध्ये भर सभेत दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बच्चू कडू पुढे म्हणाले की, दिव्यांग मंत्रालय होण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण त्यांनी नाही केलं. ते सरकार बदललं. मलाही गुवाहाटीला जाण्याचं बोलावणं आलं. देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला. मग गुवाहाटीच्या वाटेला लागलो. पण त्याअगोदर देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की अगोदर दिव्यांग मंत्रालय करा तर मी तुमच्यासोबत येणार.

हेही वाचा – बिबट्याच्या कातडीची परदेशात विक्री; सीमाशुल्क विभागाकडून साताऱ्यातून एकाला अटक

हेही वाचा – “आमच्याकडून संग्राम थोपटेंवर अन्याय झाल्यासारखं वाटतं, पण…”, काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान

गुवाहाटीला गेल्याने आम्ही बदनाम झालो. ५० खोके ५० खोके असा आमचा उल्लेख केला. पण मला बदनामीची काही चिंता नाही. शिंदे यांनी जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय उभे केले. मी दिव्यांगांसाठी उभा राहिलो. सर्वजण मंत्रीपद मागत होते. आम्हाला मंत्रालय भेटले आहे. मंत्रीपदाचं काय देणंघेणं, असे कडू म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachu kadu comment on devendra fadnavis in pimpri chinchwad over guwahati travel kjp 91 ssb