पुणे : देशात आणि राज्यात महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. त्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच सत्ताधाऱ्यांकडून ‘सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केला.
पुणे दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते पवार म्हणाले, की देशातील सर्वच महापुरुषांबद्दल सर्वांनीच आदर राखायला हवा. सर्वच महापुरुषांनी निश्चितच देशाच्या भल्यासाठी, स्वातंत्र्यासाठी, समाजप्रबोधनासाठी प्रतिकूल परिस्थितीत काम करून योगदान दिले आहे. समाजातील वातावरण दुषित होईल, असे वक्तव्य कोणीही करू नये. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज