वादे वादे जायते..
‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ यांनी आयोजित केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र‘ या उपक्रमाचे पाचवे पर्व १५ व १६ सप्टेंबर रोजी पुण्यात पार पडले. विषय होता : ‘सामाजिक चळवळींचा बदलता चेहरा’. राज्याच्या समाजजीवनातील मातब्बर अभ्यासक, कार्यकर्ते यांनी या परिषदेत धर्म, श्रद्धा, जात, सुधारणेच्या चळवळी आणि आजचे सामाजिक वास्तव अशा विविध मुद्दय़ांचा वेध घेतला, विचारमंथन केले. हे प्रश्न तसे वादाचे; पण त्या वादांमधून तत्त्वबोधच व्हावा याच भावनेने ही वादसभा पार पडली. अनेक व्यासंगी, ज्येष्ठ आणि तरुण मंडळींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या ठोस आणि विधायक चर्चेचा हा सारांश..
सामाजिकतेचा राजकारणावरील परिणाम
आधी समाजकारण मग राजकारण करावे लागेल
सध्याच्या परिस्थितीमध्ये वेगळे काढून दाखवावेत असे काही सामाजिक मुद्दे राहिले आहेत का? एकीकडे
विनय सहस्रबुद्धे, म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक
नागरिकांचे विचार बदलले आणि सत्तांतर झाले
पूर्वी राज्यसंस्था धोरणे ठरवून लोकांवर नियंत्रण ठेवत होती, मात्र आता ही परिस्थिती बदलली असून नागरी
प्रकाश पवार, राज्यशास्त्राचे प्राध्यापक
राजकीय चौकटी बदलण्यास चळवळींचा रेटा कारणीभूत
चळवळी आणि राजकारण परस्परांपासून वेगळे आहेत का? सत्तास्पर्धेचे राजकारण आणि चळवळी यांत अंतर पडते आहे का आणि ते पडत असेल तर का, याचाही विचार केला पाहिजे. गांधीजींनी अस्पृश्यता
जातीच्या राजकारणातून संकुचितता निर्माण होते. याचे कारण सर्वाची म्हणून गोष्ट असते याचाच विसर पडला आहे. त्यामुळे बहुमत असेल तर ‘चर्चा कसली? निर्णय झाला’ ही दंडेली सुरू होते. सार्वजनिक हिताचा नांगर सोडला, की राजकारण्यांची बोट बुडू शकते. हेच आपल्या राजकारणाचे झाले आहे.
प्रा. सुहास पळशीकर, राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक
वारकरी संप्रदाय आणि सामाजिक वास्तव
विठ्ठलाची विशेष पूजा बांधण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना कुणी दिला?
ज्याला आपण आता वारकरी संतपरंपरेचा काळ म्हणतो, त्याचा पाया संत नामदेवांनी घातला. हा काळ संपल्यावरही वारकरी चळवळ सुरूच राहिली. त्यामुळे सुरुवातीपासून सोळाव्या-सतराव्या शतकापर्यंतची
समाजाला जाती व्यवस्था आणि कर्मकांडाने करकचून बांधण्याच्या त्या कालखंडात लोकांना आत्मविश्वास देण्याचे काम संतांनी दिले. शांततेच्या मार्गाने लढा देण्याची ही परंपरा होती. लाखो लोक सामुदायिक प्रयत्नांतून आजही वारीला पायी जातात, विठ्ठलाला मुख्यमंत्र्यांसारखे कोणतेही मागणे मागत नाहीत, ही या परंपरेची आज टिकलेली चांगली गोष्ट. ही देवता कष्टक ऱ्यांमधूनच निर्माण झाली आणि त्यांनीच ती पुढे नेली. तरीही साने गुरुजींनी बेमुदत उपोषण करेपर्यंत अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळत नव्हता. वारकरी संप्रदायात हे कधी आले? काठी, घोंगडे आणि दहीभाताचा काला ही ओळख असलेल्या विठ्ठलाला रेशीमवस्त्र वाहावे हे कुणी सांगितले? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची विशेष पूजा बांधण्याचा अधिकार कुणी दिला? वारकरी चळवळीत मुळात नसलेल्या गोष्टी त्यात घुसडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुजारी हीदेखील अशीच नंतर घुसडली गेलेली गोष्ट आहे. आता या संप्रदायात राजकारण घुसले असून वारक ऱ्यांचे गट तयार करून स्वत:ची ‘लॉबी’ उभारण्याचेही प्रयत्न सुरू झाले आहेत; पण वारकरी या प्रयत्नांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत.
भारत पाटणकर, श्रमिक मुक्ती दलाचे ज्येष्ठ नेते
जातींमधील विद्वेष कमी करण्यासाठी वारकरी चळवळ वापरावी लागेल
वारकरी संप्रदायाचा वारसा एक हजार वर्षांपासून आहे, तरीसुद्धा आमचे जीवन कमालीचे भ्रष्ट का? की
वारकरी चळवळीत समता, प्रेम, त्याग, सोशीकपणा, लढाऊपणा अशी मूल्ये आहेत. आम्ही ती स्वीकारली नाहीत. त्यातील कर्मकांड स्वीकारणे सोपे आहे, तेवढेच आम्ही स्वीकारले. या चळवळीचा पाया नीतिमत्तेचा व आत्मशुद्धीचा आहे. वारकरी चळवळ हा विचार आहे, हत्यार नाही. मात्र, आता आपण ती हत्यार म्हणून वापरत आहोत. या प्रगल्भ वारशाचा अंगीकार करण्याची आपल्याला इच्छा आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या चळवळीत योगदान कसे देता येईल याची सुरुवात आपल्यापासून करायला हवी. त्यासाठी नुसता सोयीचा तेवढाच संतविचार घेता येणार नाही. मुळात आपल्या कोणालाच संतांचा अंगीकार करावासा वाटत नाही..
अभय टिळक, संत साहित्याचे अभ्यासक
वारकरी चळवळ पुढे न जाण्याचा दोष पुढच्या पिढीचा
महाराष्ट्रातील सामाजिक समतेच्या चळवळींचा इतिहास सांगताना ‘वारकरी संप्रदाय’ हा संदर्भबिंदू आहे.
सामाजिक वास्तवाचा महत्त्वाचा भाग म्हणजे जाती व्यवस्था. वर्गभेद, वर्णभेद, लिंगभेद या सर्वच गोष्टी विषमतेला जन्म देणाऱ्या आहेत. इथली जाती व्यवस्था ही अर्थव्यवस्था आहे. प्रत्येक जात विशिष्ट व्यवसाय करणारा सामाजिक समूह आहे. या व्यवस्थेला धर्माने मान्यता दिली. पुष्कळदा केवळ धर्माने दिलेली मान्यता पुरेशी ठरत नाही. मग ‘एखादी व्यक्ती तिची जात सोडून दुसरे काही करण्याचे ‘विकर्म’ करायला लागली, तर तिला थांबवणे हे राज्यकर्त्यांचे काम आहे, असे उल्लेख सर्व स्मृतींच्या कायद्यांमध्ये आले. इतकी घट्ट बांधलेली व्यवस्था मोडणे सोपे नाही. भगवान बुद्धांपासून वारकरी संतांपर्यंत सर्वानी ‘अमुक व्यवसाय करतो म्हणून तो श्रेष्ठ किंवा कनिष्ठ’ यावरच प्रहार केले. वारकरी इथल्याच समाजवास्तवाचा भाग असल्याने त्यांना वास्तव ओलांडून किती पुढे जायचे याच्या मर्यादा होत्या. मर्यादा संतांच्या विचारांची नव्हे, तर ती सांप्रदायिकांची होती, कारण ती माणसे आहेत; पण जेव्हा संतविचारांची अंमलबजावणी संप्रदायाकडून नीट होत नाही हे इथल्या नव्याने इंग्रजी शिकलेल्या जाणकारांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी संप्रदाय बाजूला ठेवत संतांचा विचार आत्मसात केला.
डॉ. सदानंद मोरे, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक
समता की समरसता
‘समरसता’ हा शब्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आलेला असून त्यांच्याकडूनच त्याचा आग्रह धरला जात आहे. परिवर्तनाच्या चळवळीत आम्ही पंचसूत्री मांडतो. संवाद, प्रबोधन, संघर्ष/संघटन आणि रचना या पद्धतीने काम चालते. असंघटित कामगारांची चळवळ अशीच उभी राहिली आहे.
समरसता ही संकल्पना समता टाळण्यासाठी आणलेली नाही
या देशाला, येथील परंपरेला हजारो वर्षांचे संदर्भ आहेत आणि ते लक्षात घेऊन काही गोष्टींची मांडणी करावी लागते, काही शब्दरचना करावी लागते. हजारो जाती, अनेक प्रांत, पंथ, विषमता, उच्च-नीचता, जातीयता
समता टाळण्यासाठी आम्ही ‘समरसता’ ही संकल्पना आणलेली नाही. त्या शब्दाला राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचा विरोधही नाही. संघ समता हे मूल्य मानतो. जी समता उत्पन्न होईल ती टिकवण्यासाठी समरसता हवी. समानता, समता ही बुद्धीची भाषा आहे, तर समरसता ही हृदयाची भाषा आहे. या देशातला जो मूळ हिंदू समाज आहे तोच संघटित नाही. त्यामुळे पारतंत्र्य आले हे ओळखून या समाजाला संघटित करण्यासाठी संघाची स्थापना झाली. जात-पात, प्रांत, भाषा हे भेद न मानता ‘मी हिंदू आहे’ हा भाव उत्पन्न करण्याचे काम आम्ही करतो. ही एकात्मतेची भावना म्हणजेच समरसतेची भूमिका. समरसता हा विषय संपूर्ण समाजाला कवेत घेणारा, वंचितांना न्याय देणारा आहे. जे खराब आहे ते दूर करण्यासाठी समरसता मंचाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी देशभर कार्यक्रम, आंदोलने सुरू आहेत आणि वंचितांना, उपेक्षितांना न्याय मिळवून दिला जात आहे.
भिकुजी इदाते, सामाजिक समरसता मंचाचे प्रमुख
राज्यघटनेतील मूल्ये रुजवावी लागतील
आजच्या परिस्थितीत केवळ राजवट बदलणे म्हणजे स्वातंत्र्य नाही. ते एक मूल्य आहे. प्रश्न असा आहे, की
नुसते गोलमाल बोलल्याने समाजाचे पाऊल पुढे पडणार नाही. भारतात स्त्रीवर्ग पुढे येतोय, तर बलात्कार वाढले. दलित वर्ग पुढे येतोय, तर त्यांच्यावर हल्ले होतायत. हे उत्तर आहे का? अशा भारताचा काहीच विचार करायचा नाही का? म्हणून भारतीय संविधानाचा मनोमन आदर केला पाहिजे. ते जीवनमूल्य म्हणून मानले पाहिजे. मूल्ये घटनेत आहेत. आम्ही अशी मूल्येच रुजवत नाहीत. म्हणून ती रुजवण्यात आडकाठी निर्माण करू नका. समता की समरसता याचे एका गणितासारखे उत्तर देता येणार नाही. आज समाजात विषमता भयानक वाढली आहे. वाढत्या विषमतेबद्दल काय? भ्रष्टाचाराबद्दल काय? लोकशाही मार्गाने जगात भारत म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करायची असेल, तर राज्यघटनेतील मूल्ये मानावीच लागतील आणि ती रुजवावी लागतील.
डॉ. बाबा आढाव, कष्टकऱ्यांच्या चळवळीतील ज्येष्ठ नेते
हिंदुत्वाचा शाप मिटल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही
‘समता’ आणि ‘समरसता’ या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. ‘समरसता’ हा शब्द भावनेशी संबंधित आहे. त्यामुळे त्याचा व्यावहारिक लौकिक अर्थ काढणे अवघड आहे. भारतीय राज्यघटनेने प्रौढ मताधिकार
समता ही स्वातंत्र्य आणि बंधुता यांच्यामधील गोष्ट आहे. समतेचा साधा अर्थ आहे. तो आधुनिक पाश्चिमात्य प्रबोधनातून आला आहे. प्रत्येक माणसाच्या सुप्त शक्तीच्या प्रगटीकरणाला वाव मिळेल अशी रचना निर्माण करणे म्हणजे समानता. समता हा हक्क आहे. समरसता हे विसर्जन आहे. कठोर, सनातनी हिंदुत्व हा देशाला मिळालेला मोठा शाप आहे. त्यामुळे या देशाचा इतिहास पराभवाचा इतिहास राहिलेला आहे. तो मिटल्याशिवाय हा देश महासत्ता होण्याची शक्यता नाही. जागतिकीकरणाने एक नवे जग, नवा माणूस, नवी आधुनिक मानवी संस्कृती निर्माण केली आहे. जातीची, धर्माची कूपमंडूक कृती मोडायला जागतिकीकरण फार प्रभावी अस्त्र आहे. जागतिकीकरणाची शेवटची पायरी ही माणसाचे जागतिकीकरण असेल. अशा काळात धर्म, राष्ट्र, जात आदी कूपमंडूक विचार सोडून दिले पाहिजेत. भाकडकथांच्या मागे न लागता भविष्याचा नीट विचार करा. भविष्याचा विचार करताना वर्तमान व भूतकाळ नीट समजून घ्या. वर्तमानकाळाच्या प्रकाशात भूतकाळ समजून घेतला तरच भूतकाळ समजतो. भूतकाळाच्या प्रकाशात वर्तमान समजून घेऊ नका.
डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ विचारवंत
*संकलन : अभिजित घोरपडे, अभिजित बेल्हेकर, वैशाली चिटणीस, विनायक करमरकर, पावलस मुगुटमल, बाळासाहेब जवळकर, श्रीराम ओक, विद्याधर कुलकर्णी, श्रीकृष्ण कोल्हे, रसिका मुळय़े, संपदा सोवनी.
*छायाचित्र : पवन खेंगरे, राजेश स्टीफन *
*या कार्यक्रमाची ध्वनिचित्रफीत पाहण्यासाठी http://www.youtube.com/LoksattaLive येथे भेट द्या.