scorecardresearch

काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
11 rebel corporators from Congress and NCP have decided to join BJP
कर्जतचे ११ बंडखोर नगरसेवक भाजपमध्ये

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील ११ बंडखोर नगरसेवकांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Congress took out a Tiranga Yatra in Kolhapur on Saturday in an enthusiastic atmosphere
भारतीय सैन्याच्या शौर्याला तिरंगा यात्रेद्वारे अभिवादन

राजर्षी शाहू महाराजांच्या समाधिस्थळाला अभिवादन करून या यात्रेची सुरुवात खासदार शाहू महाराज, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

Many former Congress corporators from Kolhapur will join Shiv Sena in the presence of Eknath Shinde
काँग्रेसचे माजी नगरसेवक कोल्हापुरात शिवसेनेच्या वाटेवर; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे या नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाची कोंडी फोडतील, अशी माहिती शिवसेनेचे…

BR Kadams entry into BJP is taking place in the presence of Union Home Minister Amit Shah and other leaders
कदम यांचा भाजपा प्रवेश चव्हाणांपेक्षाही ‘शाही’

या दोघांनी काँग्रेसमध्ये असताना अनेक वर्षे स्थानिक पातळीवर ज्यांना वाळीत टाकले होते, त्या बी. आर. कदम यांचा भाजपा प्रवेश केंद्रीय…

The full length statue of Vasantrao Naik will be unveiled by Union Home Minister Amit Shah
वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अमित शहा यांच्या हस्ते अनावरण

राज्याचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत नांदेड येथे उभारलेल्या व काही महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पुतळ्याचे अनावरण काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या…

मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहणारा नेता ईडीच्या रडारवर; काय आहे नेमकं प्रकरण? (फोटो सौजन्य पीटीआय)
मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहणारा नेता ईडीच्या रडारवर; काय आहे नेमकं प्रकरण?

Karnataka Home Minister : मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणारे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर ईडीच्या रडारवर आले असून केंद्रीय यंत्रणेने त्यांच्याशी संबंधित शैक्षणिक…

1991 India Pakistan military pact that BJPs Nishikant Dubey shared to attack Congress
काँग्रेसचा ‘तो’ करार देशद्रोह? १९९१ च्या करारावरून निशिकांत दुबेंची काँग्रेसवर टीका; हा करार काय?

1991 India Pakistan military pact राहुल गांधी यांच्यावर हल्ला करीत काँग्रेससमर्थित सरकारच्या काळात झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधील १९९१ च्या लष्करी…

AAP Punjab MLA arrested by his own party’s govt in corruption case Who is Raman Arora
भ्रष्टाचार प्रकरणात ‘आप’आमदाराला त्यांच्याच पक्षाच्या सरकारने केली अटक; कारण काय? कोण आहेत रमन अरोरा?

MLA arrested by his own partys government आप सरकारच्या दक्षता विभागाने शुक्रवारी भ्रष्टाचार प्रकरणात जालंधरमधील आमदार रमन अरोरा यांना अटक…

targeting Jaishankar, is Rahul Gandhi tripping on Js
सत्य देशाला कळलं पाहिजे; राहुल गांधींची परराष्ट्रमंत्र्यांवर टीका, नक्की काय म्हणाले?

Rahul Gandhi targeting s Jaishankar लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि सरकारवर सातत्याने टीका करीत असल्याचे पाहायला…

politics over supreme court decision about zudpi jungle land decisions bjp congress
झुडपी जंगलाचे राजकारण : भाजप म्हणते फायदा, काँग्रेस नेते म्हणतात तोटा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा नेमक आर्थ काय घ्यायचा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. या निर्णयामुळे विदर्भाचा फायदा होणार की तोटा ?…

काँग्रेसने डावललेल्या अमर सिंह यांची भाजपाने शिष्टमंडळात का निवड केली?

केंद्र सरकारने विरोधी पक्षाच्या खासदारांच्या पॅनेलमध्ये निवड केल्यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये काही प्रमाणात मतभेद असले तरी पंजाब भाजपाचे अध्यक्ष सुनील…

The existence of Ayuka this campus of Savitribai Phule Pune University shaped the educational environment in Pune
ताऱ्यांचे स्मरण!

‘इंटरयुनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रोनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स’ अर्थात ‘आयुका’ हा त्यातील एक. ‘एक काळ होता,’ असे म्हणावे इतकीही ही संस्था खरे…

संबंधित बातम्या