scorecardresearch

काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
PM Modi With Army
Operation Sindoor: “ऑपरेशन सिंदूरमधून पंतप्रधान मोदी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत”, काँग्रेसचा आरोप

Operation Sindoor News: काँग्रेस पक्षाने म्हटले आहे की, ते आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीमंडळांत निश्चितपणे सहभागी होतील. परंतु ऑपरेशन सिंदूरबाबत पंतप्रधान मोदी काँग्रेसच्या…

Rahul Gandhi rally in jalna loksatta
जातनिहाय जनगणनेवरील चर्चेसाठी कार्यक्रमाच्या हालचाली, राहुल गांधी उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न

राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये जालना येथे एक मेळावा घेण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

Rahul Gandhi latest news
भीतीपोटीच मोदींकडून जातनिहाय जनगणनेस मान्यता, राहुल गांधी यांचा दावा

देशातील वंचित लोकसंख्येच्या भीतीपोटीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेस मान्यता दिली, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.

Congress MP Shashi Tharoor Said This Thing
Shashi Tharoor: शशी थरूर यांच्याकडून सरकारची पाठराखण काँग्रेसमध्ये अस्वस्थता; नेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर म्हणाले, “मी भारतीय…”

Shashi Tharoor: काँग्रेस पक्षापेक्षा वेगळे मत व्यक्त करून सरकारची पाठराखण केल्याबद्दल खासदार शशी थरूर यांना पक्षाअंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत…

vidarbha konkan bank farmers loan scam congress protest
बँकेकडून शेतकऱ्यांची लूट, पीक कर्जासाठी विविध शुल्काच्या नावावर…

विदर्भ कोकण ग्रामीण बँक शेतकऱ्यांकडून पीक कर्जासाठी विविध शुल्काच्या नावाखाली आर्थिक लूट करीत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. काँग्रेसने बँकेकडे वसूल…

gadchiroli congress criticizes guardian minister demands devendra fadnavis attention
सहपालकमंत्री जयस्वाल असक्षम, मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याला किमान दोन दिवस वेळ द्यावा, काँग्रेसने…

गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित समस्या व विकासकामांवरून काँग्रेसने पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसने फडणवीस…

Maharashtra caste-wise census news in marathi
जातनिहाय जनगणनेचे श्रेय घेण्यासाठी राज्यात काँग्रेस प्रयत्नशील; राहुल गांधींच्या उपस्थितीत जालन्यात मेळावा

जातनिहाय जनगणनेच्या कॉग्रेसच्या मागणीचे श्रेय पदरात पडावे म्हणून राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये जालना येथे एक मेळावा घेण्याच्या हालचाली सुरू करण्यात…

शरद पवारांच्या मनात नक्की काय? पुन्हा विरोधी मित्रपक्षांपेक्षा वेगळ्या भूमिकेत पवार

लोकशाहीच्या मंदिरातून आपला एकतेचा आवाज घुमला पाहिजे. काश्मीरवर मध्यस्थीच्या अमेरिकेच्या प्रस्तावावर विरोधक नाराज आहेत. तसेच संसदेने पुन्हा एकदा स्पष्ट करावे…

Manohar Kumbhare appoint BJP Nagpur district president
कुंपणावरील नेत्यांसाठी भाजपची ‘ऑफर’, काँग्रेसमधून आलेल्यांना जिल्हाध्यक्षपद

कुंभारेंची नियुक्ती भाजपच्या निष्ठावंतांना जशी चाप देणारी आहे तशीच ती इतर पक्षातून भाजपमध्ये येऊ इच्छिणारे पण, सध्या कुंपणावर असणारे यांना…

Pawan Khera and Jairam Ramesh
“तुम्ही बोला, नाही तुम्ही बोला…”, तुर्कीयेबाबतचा ‘तो’ प्रश्न काँग्रेस नेत्यांनी एकमेकांवर ढकलला; पत्रकार परिषदेत नेमकं काय झालं?

Pawan Khera and Jairam Ramesh : समाजमाध्यमांवर बॉयकॉट तुर्किये (तुर्कस्तानावर बहिष्कार घाला) व बॉयकॉट अझरबैजान अशी मोहीम सुरू झाली आहे.

Amravati Congress leader Haribhau Mohods son goes missing
Congress Leader’s Son Missing: अमरावतीचे काँग्रेस नेते हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा बेपत्ता

अमरावती जिल्ह्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा वैभव…

संबंधित बातम्या