IPL 2025 : रजत पाटीदार याच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघ आयपीएल २०२५च्या फायनलमध्ये पोहचला आहे. यामुळे ही लीग पहिल्यांदाच जिंकण्याची सुवर्णसंधी या संघाकडे आहे. आरसीबीचा हा अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे. यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे समर्थकाने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे एक अनोखी मागणी केली आहे. या चाहत्याने मागणी केली आहे की जर टीम यावर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा जिंकली तर त्या दिवशी राज्यात सुट्टी जाहीर केली पाहिजे.
बेळगाव जिल्ह्यातील शिवानंद मल्लनवर नावाच्या एका चाहत्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की ज्या दिवशी आरसीबी आयपील जिंकेल त्या दिवशी अधिकृतरित्या आरसीबी फॅन्स फेस्टिवल घोषित केला जावा जो कर्नाटक राज्योत्सवाप्रमाणे साजरा केला जावा, मल्लनवर यांनी कर्नाटक सरकारला विनंती केली आहे की त्यांनी या तारखेला दरवर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी जेणेकरून राज्यातील संघाचे चाहते दरवर्षी याचा आनंदोत्सव साजरा करू शकतील. तसेच त्यांनी राज्यव्यापी उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्याचीही मागणी केली आहे. इतकेच नाही तर आरसीबीच्या विजयानंतर कर्नाटकच्या सर्व जिल्ह्यांमध्ये उत्सव साजरा करण्याची योग्य व्यवस्था केली जावी असे सल्ला देखील त्यांनी सरकारला दिला आहे.
BREAKING ? #RCB fan Shivanand wrote a letter to the Karnataka Chief Minister requesting a public holiday on June 4.
He said he’s confident that RCB will win the #IPL2025 trophy ? on June 3, and everyone should get a day off to celebrate peacefully. pic.twitter.com/dV81HoTJIm— Movies4u Official (@Movies4u_Officl) May 30, 2025
आरसीबी जिंकणार?
आरसीबीने गुरूवारी झालेल्या क्वालिफायर १ मध्ये पंजाब किग्सचा पराभव करून फायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. आरसीबीचा संघ ९ वर्षांनंतर फायनलमध्ये पोहचला आहे. आजवर आरसीबीने चार वेळा आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. हा संघ गेल्या १८ वर्षात एकही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. यादरम्यान यंदा हा संघ कमाल करणार असा विश्वास चाहत्यांना आहे. यातच ‘आरसीबी फॅन’ने हाताने लिहीलेली ही चिठ्ठी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गुरूवारी आरसीबीने क्वालीफायर १ मध्ये पंजाब सुपर किंग्स संघाचा पराभव केला आणि फायनलमध्ये एंट्री केली असली तरी आरसीबीने यापूर्वी देखील त्यांच्या चाहत्यांना निराश केले आहे. त्यामुळे यंदा आरसीबी बाजी मारणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
आज मुंबई विरुद्ध गुजरात
तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हे संघ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आज, शुक्रवारी ‘एलिमिनेटर २’च्या सामन्यात एकमेकांसमोर येणार आहे. मुंबईला पाच जेतेपदांचा अनुभव असून गुजरात संघाने एकदाच ‘आयपीएल’ करंडक उंचावला आहे. या दोन्हीपैकी पराभूत होणारा संघ विजेतेपद जिंकण्याच्या स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघाची क्वालिफायर १ मध्ये पराभूत झालेल्या पंजाब किंग्सबरोबर लढत होईल आणि फायनलमध्ये जाणारा दुसरा संघ निश्चित केला जाईल.